शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

गावठाण मालमत्तेची तयार होणार मिळकत पत्रिका

By admin | Updated: January 13, 2016 03:01 IST

गावागावात वादाचे मूळ असलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे.

भूमी अभिलेख विभागाचे महाभूमी अभियान : पहिल्या टप्प्यात १३० गावठाणांची होणार मोजणीयवतमाळ : गावागावात वादाचे मूळ असलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३० गावांतील गावठाणाची मोजणी करण्यात येणार असून मालमत्तेची मिळकत पत्रिकाही तयार केली जाणार आहे. कायदेशीर नोंदणीमुळे वाद मिटण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागामध्ये परंपरागत पद्धतीनेच जागेचे क्षेत्र निर्धारण केले जाते. पिढीजात मिळालेल्या या जागेची कुठेही अधिकृत नोंद नसते. तोंडी व्यवहारातूनच या जागांचे हस्तांतरण केले जाते. अनेक ठिकाणी सीमांकनावरून वाद झाले आहे. अनेक ठिकाणी तर एकाच कुटुंबात टोकाचे वाद दिसून येतात. त्यातून गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. शिवाय फौजदारी खटलेही दाखल होतात. यातून संबंधित कुटुंबाचे तर नुकसान होतेच. गावाचेही यातून मोठे नुकसान होते. हा प्रकार टाळण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील २०११ च्या जनगनणेनुसार दोन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील मालमत्तेची मोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील अशा १३० गावांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पाच शहरातील गावठाणांची मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळ तालुक्यातील येळाबारा, बाभूळगावमधील गळव्हा, कळंबमधील सावरगाव, नांझा, केळापूरमधील उमरी, घाटंजीतील मानोली, आर्णीतील दाभडी, महागावमधील पोहंडूळ, पुसदमधील श्रीरामपूर, दिग्रस तालुक्यातील माळहिवरा, दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे आणि नेर तालुक्यातील धनज येथे गावठाणाची मोजणी करण्यात आली होती. तेथे तब्बल १२ हजार ७७ मिळकत पत्रिकांचे वितरण करण्यात आले होते. कायदेशीर नोंदणीमुळे भविष्यात होणारे वाद मिटणार आहे. शिवाय गावातील मालमत्तेची अधिकृत नोंद ठेवता येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीला कर आकारणीतही फायदा होईल.गावठाण मोजणीतून हद्द निश्चित झाल्याने शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विकास निधीतील कामे गावठाण हद्दीत करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. त्या क्षेत्राबाहेरचे काम इतर यंत्रणेकडून करून घ्यावे लागते. कोणत्याही कामासाठी भूमिअभिलेख विभागाने तयार केलेला नकाशाच ग्राह्य मानला जातो. त्याचाच आधार घेऊन गावातील विकास कामांचे नियोजन करता येणार आहे. भविष्यातील अतिक्रमणाचा प्रश्नही निकाली निघणार आहे. ग्रामीण भागासाठी हे अभियान अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)