शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

गावठाण मालमत्तेची तयार होणार मिळकत पत्रिका

By admin | Updated: January 13, 2016 03:01 IST

गावागावात वादाचे मूळ असलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे.

भूमी अभिलेख विभागाचे महाभूमी अभियान : पहिल्या टप्प्यात १३० गावठाणांची होणार मोजणीयवतमाळ : गावागावात वादाचे मूळ असलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३० गावांतील गावठाणाची मोजणी करण्यात येणार असून मालमत्तेची मिळकत पत्रिकाही तयार केली जाणार आहे. कायदेशीर नोंदणीमुळे वाद मिटण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागामध्ये परंपरागत पद्धतीनेच जागेचे क्षेत्र निर्धारण केले जाते. पिढीजात मिळालेल्या या जागेची कुठेही अधिकृत नोंद नसते. तोंडी व्यवहारातूनच या जागांचे हस्तांतरण केले जाते. अनेक ठिकाणी सीमांकनावरून वाद झाले आहे. अनेक ठिकाणी तर एकाच कुटुंबात टोकाचे वाद दिसून येतात. त्यातून गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. शिवाय फौजदारी खटलेही दाखल होतात. यातून संबंधित कुटुंबाचे तर नुकसान होतेच. गावाचेही यातून मोठे नुकसान होते. हा प्रकार टाळण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील २०११ च्या जनगनणेनुसार दोन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील मालमत्तेची मोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील अशा १३० गावांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पाच शहरातील गावठाणांची मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळ तालुक्यातील येळाबारा, बाभूळगावमधील गळव्हा, कळंबमधील सावरगाव, नांझा, केळापूरमधील उमरी, घाटंजीतील मानोली, आर्णीतील दाभडी, महागावमधील पोहंडूळ, पुसदमधील श्रीरामपूर, दिग्रस तालुक्यातील माळहिवरा, दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे आणि नेर तालुक्यातील धनज येथे गावठाणाची मोजणी करण्यात आली होती. तेथे तब्बल १२ हजार ७७ मिळकत पत्रिकांचे वितरण करण्यात आले होते. कायदेशीर नोंदणीमुळे भविष्यात होणारे वाद मिटणार आहे. शिवाय गावातील मालमत्तेची अधिकृत नोंद ठेवता येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीला कर आकारणीतही फायदा होईल.गावठाण मोजणीतून हद्द निश्चित झाल्याने शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विकास निधीतील कामे गावठाण हद्दीत करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. त्या क्षेत्राबाहेरचे काम इतर यंत्रणेकडून करून घ्यावे लागते. कोणत्याही कामासाठी भूमिअभिलेख विभागाने तयार केलेला नकाशाच ग्राह्य मानला जातो. त्याचाच आधार घेऊन गावातील विकास कामांचे नियोजन करता येणार आहे. भविष्यातील अतिक्रमणाचा प्रश्नही निकाली निघणार आहे. ग्रामीण भागासाठी हे अभियान अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)