शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बाळापूर येथे गॅस्ट्रोचा उद्रेक

By admin | Updated: July 12, 2017 01:05 IST

वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून

६० जणांना बाधा : ३० रुग्णांवर वणीत उपचार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून त्यातील ३० जणांवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ३० जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. गावात गॅस्ट्रोची लागण झालयने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक गावातील काही नागरिकांना उलटी, मळमळ व हगवणीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने कायर येथील एका खासगी डॉक्टरला उपचारासाठी बाळापुरात पाचारण करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहून सोमवारी दुपारी गावातील ३० गंभीर रुग्णांना दुपारी १२ वाजता मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास या सर्व रुग्णांना वणी येथे आणण्यात आले. यांपैैकी २२ रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून आठजण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. दूषित पाण्यामुळेच गावकऱ्यांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याचे ते म्हणाले. राम गिरी (७०), रघुनाथ चिंचोळकर (७०), मिरा बोंडे (५०), मंगला पायघन (३०). सुनिता बुच्चे (३०), विमल भोयर (५०), देवी पानघाटे (४५), मंगला वाघाडे (१०), पौैर्णिमा वाघाडे (१७), चंद्रकला मत्ते (४५), मंगला बोंडे (३५), मिरा पिंगे (५५), कोमल बोंडे (१७), पिंकी पंधरे (१७), संतोषी कोडापे (१६), सुरेखा हनुमंते (३५), रेखा ढेंगळे (१५), कौैशल्या ढेंगळे (१०), गौैरव पंधरे (२२), मधुकर हनुमंते (५०), सुनिल पिंगे (५५), मोहन पानघाटे (४०) यांच्यावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संदीप उपरे (२५), शारदा उपरे (४०), भावना संदीप उपरे (२२), पल्लवी मोहारे (१७), अनिल मोहारे (४०), सुनिता मोहारे (३२), पौैर्णिमा मोहारे (१७), मयूर मोहारे (१४) यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळापुरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर सदर हातपंपाजवळ पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावला. मात्र त्यानंतरही नागरिकांनी पाण्याचा वापर पिण्यासाठी केला. - विलास नैताम, सरपंच बाळापूर (बोपापूर) हातपंपाचे पाणी दूषित बाळापूर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खताचे ढिगारे उभे आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावल्याचा दावा सरपंचांनी केला असला तरी हा दावा खोटा असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.