शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बाळापूर येथे गॅस्ट्रोचा उद्रेक

By admin | Updated: July 12, 2017 01:05 IST

वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून

६० जणांना बाधा : ३० रुग्णांवर वणीत उपचार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून त्यातील ३० जणांवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ३० जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. गावात गॅस्ट्रोची लागण झालयने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक गावातील काही नागरिकांना उलटी, मळमळ व हगवणीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने कायर येथील एका खासगी डॉक्टरला उपचारासाठी बाळापुरात पाचारण करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहून सोमवारी दुपारी गावातील ३० गंभीर रुग्णांना दुपारी १२ वाजता मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास या सर्व रुग्णांना वणी येथे आणण्यात आले. यांपैैकी २२ रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून आठजण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. दूषित पाण्यामुळेच गावकऱ्यांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याचे ते म्हणाले. राम गिरी (७०), रघुनाथ चिंचोळकर (७०), मिरा बोंडे (५०), मंगला पायघन (३०). सुनिता बुच्चे (३०), विमल भोयर (५०), देवी पानघाटे (४५), मंगला वाघाडे (१०), पौैर्णिमा वाघाडे (१७), चंद्रकला मत्ते (४५), मंगला बोंडे (३५), मिरा पिंगे (५५), कोमल बोंडे (१७), पिंकी पंधरे (१७), संतोषी कोडापे (१६), सुरेखा हनुमंते (३५), रेखा ढेंगळे (१५), कौैशल्या ढेंगळे (१०), गौैरव पंधरे (२२), मधुकर हनुमंते (५०), सुनिल पिंगे (५५), मोहन पानघाटे (४०) यांच्यावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संदीप उपरे (२५), शारदा उपरे (४०), भावना संदीप उपरे (२२), पल्लवी मोहारे (१७), अनिल मोहारे (४०), सुनिता मोहारे (३२), पौैर्णिमा मोहारे (१७), मयूर मोहारे (१४) यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळापुरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर सदर हातपंपाजवळ पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावला. मात्र त्यानंतरही नागरिकांनी पाण्याचा वापर पिण्यासाठी केला. - विलास नैताम, सरपंच बाळापूर (बोपापूर) हातपंपाचे पाणी दूषित बाळापूर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खताचे ढिगारे उभे आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावल्याचा दावा सरपंचांनी केला असला तरी हा दावा खोटा असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.