शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बाळापूर येथे गॅस्ट्रोचा उद्रेक

By admin | Updated: July 12, 2017 01:05 IST

वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून

६० जणांना बाधा : ३० रुग्णांवर वणीत उपचार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून त्यातील ३० जणांवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ३० जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. गावात गॅस्ट्रोची लागण झालयने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक गावातील काही नागरिकांना उलटी, मळमळ व हगवणीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने कायर येथील एका खासगी डॉक्टरला उपचारासाठी बाळापुरात पाचारण करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहून सोमवारी दुपारी गावातील ३० गंभीर रुग्णांना दुपारी १२ वाजता मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास या सर्व रुग्णांना वणी येथे आणण्यात आले. यांपैैकी २२ रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून आठजण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. दूषित पाण्यामुळेच गावकऱ्यांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याचे ते म्हणाले. राम गिरी (७०), रघुनाथ चिंचोळकर (७०), मिरा बोंडे (५०), मंगला पायघन (३०). सुनिता बुच्चे (३०), विमल भोयर (५०), देवी पानघाटे (४५), मंगला वाघाडे (१०), पौैर्णिमा वाघाडे (१७), चंद्रकला मत्ते (४५), मंगला बोंडे (३५), मिरा पिंगे (५५), कोमल बोंडे (१७), पिंकी पंधरे (१७), संतोषी कोडापे (१६), सुरेखा हनुमंते (३५), रेखा ढेंगळे (१५), कौैशल्या ढेंगळे (१०), गौैरव पंधरे (२२), मधुकर हनुमंते (५०), सुनिल पिंगे (५५), मोहन पानघाटे (४०) यांच्यावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संदीप उपरे (२५), शारदा उपरे (४०), भावना संदीप उपरे (२२), पल्लवी मोहारे (१७), अनिल मोहारे (४०), सुनिता मोहारे (३२), पौैर्णिमा मोहारे (१७), मयूर मोहारे (१४) यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळापुरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर सदर हातपंपाजवळ पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावला. मात्र त्यानंतरही नागरिकांनी पाण्याचा वापर पिण्यासाठी केला. - विलास नैताम, सरपंच बाळापूर (बोपापूर) हातपंपाचे पाणी दूषित बाळापूर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खताचे ढिगारे उभे आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावल्याचा दावा सरपंचांनी केला असला तरी हा दावा खोटा असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.