शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

गांजा तस्करीत दाम्पत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:40 IST

जिल्ह्यालगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते. या तस्करीतील मुख्य आरोपीच शहर पोलिसांच्या हाती लागला.

ठळक मुद्देतेलंगणातून आयात : २० लाखांचा एक क्विंटल गांजा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यालगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते. या तस्करीतील मुख्य आरोपीच शहर पोलिसांच्या हाती लागला. त्यांनी शुक्रवारी दुपारी १ वाजता पांढरकवडा बायपास चौफुलीवर गांजा तस्कर दाम्पत्याला अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २० लाख रूपये किंमतीचा १०६ किलो गांजा जप्त करण्यात आला.संजय कैलास गिरी (५१), त्याची पत्नी बेला संजय गिरी (४८) रा. मुंडगाव, ता. आकोट, जि. आकोला अशी अटकेतील आरोपींची नाव आहे. त्यांनी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील वारंगल येथून गुरूवारी रात्री इंडिगो कारच्या डिक्कीमध्ये १०६ किलो गांजाचे ४७ पॉकेट भरले. हा गांजा घेऊन हे दाम्पत्य केळापूरमार्गे यवतमाळकडे येत होते. याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी जोडमोहा येथून कारचा पाठलाग सुरू केला. दुसरे पथक पांढरकवडा बायपासवरील चौफुलीवर उभे होते. तेथे सापळा रचून वाहन पकडले.झडतीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळला. आरोपी गेल्या चार वर्षांपासून गांजा तस्करीचा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले. कुणाला संशय येऊ नये यासाठी तो वाहनात पत्नीला सोबत घेत होता. प्रवासादरम्यान वाहनाचे सर्व काच जाणीवपूर्वक उघडे ठेवले जात होते. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी ही दक्षता घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.