शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

भगीरथ प्रयत्नाने अवतरली कोलाम पोडावर गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:52 IST

संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक भांडे भरेपर्यंत वाटतात पाणीलोहाराच्या उद्योगनगरात प्रेरणास्रोत

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे. कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी लोकवर्गणीतून सक्षम यंत्रणा उभी केली आहे.लोहारा परिसरातील उद्योगनगरच्या कोलाम पोडावर पाण्याची भीषण टंचाई आहे. २७०० लोकसंख्या असलेल्या या भागातील कोलाम बांधवांची घरे कुडामातीची आहेत. त्यांच्या घरात जेवनासाठीची भांडी नाही, तर पाणी साठवण्यासाठी टाक्या कुठून असणार. पालिकेच्या हद्दवाढीतून हा भाग वगळला आहे. सरकारी यंत्रणेतील एकही टँकर या भागात फिरकत नाही. यामुळे काही नागरिकांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. एक दोन दिवसांसाठी टँकरची व्यवस्थाच नाही तर कायमस्वरूपी व्यवस्था म्हणून लोकवर्गणीतून वाढीव पाईप लाईन सुरू केली आहे.या पाण्यावर गरज पूर्ण होत नाही म्हणून स्वतंत्र टँकरची व्यवस्था लोकवर्गणीतून करण्यात आली. टँकरने प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविले जाते. आवश्यक तेवढे पाणी त्यांना देण्यात येते. हद्दवाढीतुन वगळल्यापासून या भागातील नागरिकांचा मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संजय चव्हाण, गणेश कानोड, राजू कट्यारमल, बबलू देशमुख यानी पुढाकार घेऊन काम सुरू केले. दीड लाखांची लोकवर्गणी गोळा केली. यातून या भागामध्ये वाढीव पाईपलाईन आणि स्टँडपोेज दुरूस्ती केली आहे. बबलू देशमुख यांच्या बोअरवरून या भागात पाणी पुरविले जात आहे. दुसरी बोअर करून पाणी वाटपाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न आहे.मागील तीन वर्षांपासून या भागाच्या विलिनीकरणासाठी काही मंडळी झटत आहे. आता अलीकडे जिल्हा परिषदेने हा संपूर्ण भाग ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असल्याचे म्हटले आहे. यामुळे या भागावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण राहणार आहे. दरम्यान, या भागाला पाणी वितरणासाठी पंचायत विभागाने टँकरची व्यवस्था केली आहे.टँकर आल्याची घरोघरी सूचनाया भागात पाणी वितरणासाठी विशेष पध्दत आहे. टँकर पोहोचताच घरोघरी सूचना दिली जाते. टाकी नाही म्हणून पाणी देणे टाळले जात नाही. घरातील लहान मोठे भांडे भरेपर्यंत टँकर उभे राहते.लोकसहभागातून टंचाईवर मातसंपूर्ण शहरातील पाणी टंचाई आणि लगतच्या भागातील भीषणता पाहता अंगावर शहारे येतात. आमच्या भागात अशीच स्थिती राहिली असती. लोकसहभाग आणि पुढाकाराने त्यावर मात करता आली, असे अनिता भैरट, आशा खंदरकर, सिंधू बडदे, सावित्री तापसे, प्रतिभा खंदरकर, पुष्पा कुकडे, पायल शिंदे, जयश्री कानोडे, पुष्पा टेकाम, जोत्सना डोईजड, सीमा काकडे, रेखा येरावार, रत्नमाला मेश्राम म्हणाल्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई