शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

भगीरथ प्रयत्नाने अवतरली कोलाम पोडावर गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:52 IST

संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक भांडे भरेपर्यंत वाटतात पाणीलोहाराच्या उद्योगनगरात प्रेरणास्रोत

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे. कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी लोकवर्गणीतून सक्षम यंत्रणा उभी केली आहे.लोहारा परिसरातील उद्योगनगरच्या कोलाम पोडावर पाण्याची भीषण टंचाई आहे. २७०० लोकसंख्या असलेल्या या भागातील कोलाम बांधवांची घरे कुडामातीची आहेत. त्यांच्या घरात जेवनासाठीची भांडी नाही, तर पाणी साठवण्यासाठी टाक्या कुठून असणार. पालिकेच्या हद्दवाढीतून हा भाग वगळला आहे. सरकारी यंत्रणेतील एकही टँकर या भागात फिरकत नाही. यामुळे काही नागरिकांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. एक दोन दिवसांसाठी टँकरची व्यवस्थाच नाही तर कायमस्वरूपी व्यवस्था म्हणून लोकवर्गणीतून वाढीव पाईप लाईन सुरू केली आहे.या पाण्यावर गरज पूर्ण होत नाही म्हणून स्वतंत्र टँकरची व्यवस्था लोकवर्गणीतून करण्यात आली. टँकरने प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविले जाते. आवश्यक तेवढे पाणी त्यांना देण्यात येते. हद्दवाढीतुन वगळल्यापासून या भागातील नागरिकांचा मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संजय चव्हाण, गणेश कानोड, राजू कट्यारमल, बबलू देशमुख यानी पुढाकार घेऊन काम सुरू केले. दीड लाखांची लोकवर्गणी गोळा केली. यातून या भागामध्ये वाढीव पाईपलाईन आणि स्टँडपोेज दुरूस्ती केली आहे. बबलू देशमुख यांच्या बोअरवरून या भागात पाणी पुरविले जात आहे. दुसरी बोअर करून पाणी वाटपाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न आहे.मागील तीन वर्षांपासून या भागाच्या विलिनीकरणासाठी काही मंडळी झटत आहे. आता अलीकडे जिल्हा परिषदेने हा संपूर्ण भाग ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असल्याचे म्हटले आहे. यामुळे या भागावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण राहणार आहे. दरम्यान, या भागाला पाणी वितरणासाठी पंचायत विभागाने टँकरची व्यवस्था केली आहे.टँकर आल्याची घरोघरी सूचनाया भागात पाणी वितरणासाठी विशेष पध्दत आहे. टँकर पोहोचताच घरोघरी सूचना दिली जाते. टाकी नाही म्हणून पाणी देणे टाळले जात नाही. घरातील लहान मोठे भांडे भरेपर्यंत टँकर उभे राहते.लोकसहभागातून टंचाईवर मातसंपूर्ण शहरातील पाणी टंचाई आणि लगतच्या भागातील भीषणता पाहता अंगावर शहारे येतात. आमच्या भागात अशीच स्थिती राहिली असती. लोकसहभाग आणि पुढाकाराने त्यावर मात करता आली, असे अनिता भैरट, आशा खंदरकर, सिंधू बडदे, सावित्री तापसे, प्रतिभा खंदरकर, पुष्पा कुकडे, पायल शिंदे, जयश्री कानोडे, पुष्पा टेकाम, जोत्सना डोईजड, सीमा काकडे, रेखा येरावार, रत्नमाला मेश्राम म्हणाल्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई