शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

कोरोनाच्या संकटात कोवळ्या कळ्यांचे भविष्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

बहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर नेरच्या मुकिंदपूरमधील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी प्रशासन तिच्या घरी धडकल्यावर मातापित्यांनी हमीपत्र लिहून दिले.

ठळक मुद्देबालविवाहांचा सपाटा : वर्षभरात ३०, तर एकट्या एप्रिलमध्ये ८ घटना, गाव समित्या अलर्ट

अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे प्रशासन व्यस्त आहे. खेड्यापाड्यातील अनेक घातक रुढी, परंपरांना त्यामुळे मोकळे रान मिळत आहे. त्याचाच गैरफायदा घेत जिल्ह्यात कोवळ्या वयाच्या मुलींचे थोराड युवकांशी लग्न लावून देण्याची लाट आली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात तब्बल आठ बालविवाहांच्या घटना पुढे आल्या. कोरोनाची पहिली लाट थंडावल्यानंतर बालविवाहही थंडावल्याचे दिसले. मात्र फेब्रुवारीपासून कोरोनाही वाढू लागला अन् बालविवाहदेखील मोठ्या प्रमाणात ठरू लागलेत. प्रशासनाच्या कारवाईनंतरही बालविवाहांचे घाट घातले जात आहेत.गेल्या वर्षभरात तब्बल ३० बालविवाह उघड झाले. जे उघड होऊ शकले नाही, त्यांची तर गणतीच नाही. अज्ञान, गरिबी, बेरोजगारी अशी कारणे पुढे करीत अनेकजण बालविवाहांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुलगी हे परक्याचे धन मानून शक्य तेवढ्या लवकर तिला ‘उजविण्याचा’ प्रयत्न खुद्द जन्मदात्यांकडूनच केला जात आहे. इतर वेळी बालविवाह प्रतिबंध कायद्याचा धाक असतो. मात्र, सध्या संपूर्ण प्रशासन कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुरफटले आहे. दुर्गम खेड्यापाड्यातील लोक त्याचाच फायदा घेत लपूनछपून, तर कुठे उघडउघड अल्पवयीन मुलींचे विवाह करीत आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात असे तब्बल आठ बालविवाह जिल्हा बालसंरक्षण कक्षाने चव्हाट्यावर आणले. मात्र, अद्यापही हा प्रकार थांबायचे नाव घेताना दिसत नाही. 

खंडाळा, घाटंजीत दोन प्रकरणात गुन्हेबहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर नेरच्या मुकिंदपूरमधील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी प्रशासन तिच्या घरी धडकल्यावर मातापित्यांनी हमीपत्र लिहून दिले. मात्र प्रशासन परत जाताच पुन्हा लग्नाची तयारी केली अन् अवघ्या चार दिवसातच घाटंजी तालुक्यात जाऊन लग्नसोहळा पार पाडला. याही प्रकरणात घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया  १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कोरोनाच्या एक वर्षात अमरावती विभागात प्रशासनाने तब्बल ७२ बालविवाह उघडकीस आणून रोखले. त्यात विभागातील पाचही जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ बालविवाह रोखले गेले. वाशिमध्ये १२, बुलडाणा २१, अमरावती १२ तर अकोला जिल्ह्यात ५ बालविवाह रोखले गेले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात मार्चनंतरही बालविवाहांचा सपाटा सुरूच आहे. मार्चनंतर अवघ्या महिनाभरात तब्बल ८ बालविवाहांच्या घटना पुढे आल्या. 

आणखी तीन कारवाया प्रशासनाच्या टप्प्यात कोरोनाच्या निर्बंधाआडून अत्यल्प खर्चात मुलीचे लग्न लावून देता येईल, या घाईतून बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अल्पवयातील प्रेमप्रकरणेही कारणीभूत ठरत आहे. मात्र आपण गाव बालसंरक्षण समित्यांच्या कार्यशाळा घेतल्याने या समित्या जागृत झाल्या आहे. यावर्षीच्या कारवायांचे प्रमाण गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आहे. कळंब, मारेगाव आणि बाभूळगाव तालुक्यातील आणखी तीन बालविवाहांची माहिती आली असून लवकरच कारवाई केली जाईल.           - देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी  

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या