शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

महागाईविरोधात काढली शवयात्रा

By admin | Updated: October 18, 2015 02:40 IST

यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली.

मनसेचे आंदोलन : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदनवणी : यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली. ही शवयात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकून तेथे त्यांना निवेदन सादर करण्यात आले. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असतानाच महागाईचा भडका उडाला आहे. सध्या तूरडाळ ७३ रूपयांवरून १९५ रूपयांवर पोहोचली आहे. चनाडाळ ५० रूपये वरून ९५ रूपये, उडीदडाळ ७१ वरून १३० वर, मूगडाळ ७० वरून ११० वर, तर मसूरडाळ ६९ रूपयांवरून १०० रूपयांवर पोहोचली आहे. या भरमसाठ वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडल्याचा आरोप मनसेने केला आहे. जीावनावश्यक वस्तूंचे दर भडकल्याने गरीब जनतेचे मोठे हाल होत आहे. या भाववाढीचा शेतकऱ्याला एकही रूपयांचा लाभ नसून केवळ दलाल व व्यापारी भाव वाढ करून सामान्य जनतेच्या जिवावर उठल्याचा आरोपही मनसेने केला आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य शासनाने केवळ जिल्ह्यामधील दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असताना शासनाने केवळ दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप मनसेने केला आहे. संपूर्ण विदर्भच दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा, महागाई कमी करावी, आदी मागण्यांसाठी मनसेने ही शवयात्रा काढली होती. या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.नांदेपेरा मार्गावरील मनसेच्या कार्यालयापासून ही शवयात्रा काढण्यात आली. शवयात्रेत चौघांच्या खांद्यावर महागाईची तिरडी होती. तिरडीवर विविध घोषणा लिहिलेले फलक लावले होते. शवयात्रेसमोर मनसेचा एक कार्यकर्ता आगटे धरून होता. त्या मागे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महागाई कमी करा, शासनाचा निषेध असो, आदी घोषणा देत चालत होते. ही शवयात्रा आगळीवेगळी ठरली. नागरिकांनाही प्रथमदर्शनी कुणाचा तरी मृत्यू झाला असावा, त्याचीच ही शवयात्रा असावी, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्ष बघितल्यानंतर खरी स्थिती सर्वांना कळली. दरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, संतोष रोगे, रमेश सोनुले, शेख आजीद, रोशन शिंदे, उमेश वैरागडे, विनोद चोपणे, विनोद कुचनकर, मिलींद पेंदाने आदींना अटक करून गुन्हा दाखल केला. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना सायंकाळी सोडण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)