शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

महागाईविरोधात काढली शवयात्रा

By admin | Updated: October 18, 2015 02:40 IST

यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली.

मनसेचे आंदोलन : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदनवणी : यावर्षी सर्वत्र भडकलेली महागाई व कापसाला अत्यल्प भाव घोषित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी शहरातून महागाई विरोधी शवयात्रा काढली. ही शवयात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकून तेथे त्यांना निवेदन सादर करण्यात आले. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असतानाच महागाईचा भडका उडाला आहे. सध्या तूरडाळ ७३ रूपयांवरून १९५ रूपयांवर पोहोचली आहे. चनाडाळ ५० रूपये वरून ९५ रूपये, उडीदडाळ ७१ वरून १३० वर, मूगडाळ ७० वरून ११० वर, तर मसूरडाळ ६९ रूपयांवरून १०० रूपयांवर पोहोचली आहे. या भरमसाठ वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडल्याचा आरोप मनसेने केला आहे. जीावनावश्यक वस्तूंचे दर भडकल्याने गरीब जनतेचे मोठे हाल होत आहे. या भाववाढीचा शेतकऱ्याला एकही रूपयांचा लाभ नसून केवळ दलाल व व्यापारी भाव वाढ करून सामान्य जनतेच्या जिवावर उठल्याचा आरोपही मनसेने केला आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य शासनाने केवळ जिल्ह्यामधील दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असताना शासनाने केवळ दोनच गावे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप मनसेने केला आहे. संपूर्ण विदर्भच दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा, महागाई कमी करावी, आदी मागण्यांसाठी मनसेने ही शवयात्रा काढली होती. या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.नांदेपेरा मार्गावरील मनसेच्या कार्यालयापासून ही शवयात्रा काढण्यात आली. शवयात्रेत चौघांच्या खांद्यावर महागाईची तिरडी होती. तिरडीवर विविध घोषणा लिहिलेले फलक लावले होते. शवयात्रेसमोर मनसेचा एक कार्यकर्ता आगटे धरून होता. त्या मागे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महागाई कमी करा, शासनाचा निषेध असो, आदी घोषणा देत चालत होते. ही शवयात्रा आगळीवेगळी ठरली. नागरिकांनाही प्रथमदर्शनी कुणाचा तरी मृत्यू झाला असावा, त्याचीच ही शवयात्रा असावी, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्ष बघितल्यानंतर खरी स्थिती सर्वांना कळली. दरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, संतोष रोगे, रमेश सोनुले, शेख आजीद, रोशन शिंदे, उमेश वैरागडे, विनोद चोपणे, विनोद कुचनकर, मिलींद पेंदाने आदींना अटक करून गुन्हा दाखल केला. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना सायंकाळी सोडण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)