शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे

By admin | Updated: April 10, 2015 00:13 IST

मानव हा धर्मासाठी नाही. स्वातंत्र्य, समता, बुधंता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इसादास भडके यांनी केले.

पुसद : कोणताही धर्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे. मानव हा धर्मासाठी नाही. स्वातंत्र्य, समता, बुधंता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इसादास भडके यांनी केले. ते गुरुवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाच्या द्वितीय पुष्प गुंफताना बोलत होते.महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुरुवारी दुसऱ्या दिवशी ‘मी धम्ममार्गी का झालो’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक चळवळीचे नेते अ‍ॅड. आप्पाराव मैंद होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार संतोष पवार, ज्ञानेश्वर तडसे, आशाताई चापके, आशाताई कदम, नितीन पवार, दिनकर गोस्वामी, प्रा. हसनैन खान, गोवर्धन मोहिते, विकास जामकर, प्रा.डॉ. वंदना फुंडकर, अण्णा दोडके, सूर्यभान कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने प्रबोधनपर नाटिकाही सादर करण्यात आली. पुढे बोलताना प्रा. इसादास भडके म्हणाले, आज मानवी हक्काचे जे आंतरराष्ट्रीय मानक ठरले आहे, विविध देशांच्या राज्य घटनांमध्ये ज्या मानवतावादी गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला, त्या सगळ्या जीवनमूल्यांचा समावेश फ्रेंच राज्यक्रांतीच्या कितीतरी आधी बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये केलेला आढळतो. जगात हिंसाचाराचा जो भयावह प्रकार सुरू आहे, त्याला केवळ बौद्ध तत्त्वज्ञानानेच थांबविता येऊ शकते. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीसुद्धा विचार व्यक्त केले. प्रज्ञापर्व आयोजन समितीचे अध्यक्ष शीतलकुमार वानखडे, किशोर मुजमुले, गौतम सूर्यवंशी, अ‍ॅड. वाय.एन. जांभुळकर, मिलिंद हाटेकर, मनोज खिराडे, भीमराव उमरे, सुभाष गायकवाड, नारायण ठोके, मिलिंद सुरडकर, शशांक भरणे, बाळासाहेब कांबळे, जगदीश सावळे, आनंद नरवाडे, मंदा डांगरे, संघपाल आडोळे, विलास भवरे, प्रा. महेश हंबर्डे, भगवान हनवते, प्रा. दादाराव अगमे, शरद टेंबरे, संतोष गायकवाड, किशोर मनवर, अशोक वाहुळे, आर.एस. रायबोले, राजेंद्र वाघमारे आदींसह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)