शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे विक्रीसाठी फ्रीज, सोन्यासह व्यापाऱ्यांना परदेश दौऱ्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल कॅश करण्यासाठी बियाणे कंपन्यांनी विक्रेत्यांना काश्मीरसह विदेश दौऱ्याचे पॅकेज जाहीर केले आहे. यासोबतच गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना या पॅकेजमधून मोठे आमिष दाखविल्याने  बाजारपेठेत शेतकऱ्यांना सतर्क राहून बियाण्यांची खरेदी करावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरिपाचा हंगाम कॅश करण्यासाठी १०० कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यांनी गावपातळीवर पोस्टर युद्ध सुरू केले आहे. हे युद्ध इतके भयंकर आहे की, गावाचे बोर्ड आणि किलोमीटरचे दगड त्यांनी व्यापून टाकले आहे. एखाद्या निवडणुकीला शोभेल, असा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे.यावर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे. याशिवाय पर्यटनासाठी काश्मीर या ठिकाणांचा समावेश आहे. यासोबतच काही ठराविक पॅकेट्स विकल्यानंतर टीव्ही, फ्रीज, सोनेदेखील कंपन्यांनी जाहीर केलेले आहे. प्रत्येक कंपन्यांचे विक्रेते आमचा कोटा पूर्ण केला तर ठराविक रक्कम गाठल्यानंतर हे पॅकेज देणार आहे. यामुळे विक्रेते ज्या ठिकाणावरून सर्वाधिक नफा होईल, अशाच कंपन्यांना शेतकऱ्यांच्या माथी मारण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची नितांत गरज आहे. 

महाडीबीटी पोर्टलवर १४,७०० अर्ज-  येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बुधवारी २५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. - त्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि कुठले बियाणे पाहिजे, याची माहिती ऑनलाईन भरायची आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १४ हजार ७०० अर्ज आले आहेत. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती