शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बियाणे विक्रीसाठी फ्रीज, सोन्यासह व्यापाऱ्यांना परदेश दौऱ्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल कॅश करण्यासाठी बियाणे कंपन्यांनी विक्रेत्यांना काश्मीरसह विदेश दौऱ्याचे पॅकेज जाहीर केले आहे. यासोबतच गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना या पॅकेजमधून मोठे आमिष दाखविल्याने  बाजारपेठेत शेतकऱ्यांना सतर्क राहून बियाण्यांची खरेदी करावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरिपाचा हंगाम कॅश करण्यासाठी १०० कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यांनी गावपातळीवर पोस्टर युद्ध सुरू केले आहे. हे युद्ध इतके भयंकर आहे की, गावाचे बोर्ड आणि किलोमीटरचे दगड त्यांनी व्यापून टाकले आहे. एखाद्या निवडणुकीला शोभेल, असा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे.यावर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे. याशिवाय पर्यटनासाठी काश्मीर या ठिकाणांचा समावेश आहे. यासोबतच काही ठराविक पॅकेट्स विकल्यानंतर टीव्ही, फ्रीज, सोनेदेखील कंपन्यांनी जाहीर केलेले आहे. प्रत्येक कंपन्यांचे विक्रेते आमचा कोटा पूर्ण केला तर ठराविक रक्कम गाठल्यानंतर हे पॅकेज देणार आहे. यामुळे विक्रेते ज्या ठिकाणावरून सर्वाधिक नफा होईल, अशाच कंपन्यांना शेतकऱ्यांच्या माथी मारण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची नितांत गरज आहे. 

महाडीबीटी पोर्टलवर १४,७०० अर्ज-  येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बुधवारी २५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. - त्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि कुठले बियाणे पाहिजे, याची माहिती ऑनलाईन भरायची आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १४ हजार ७०० अर्ज आले आहेत. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती