शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकऱ्यांसाठी मोफत प्रवास सुविधा

By admin | Updated: November 9, 2016 00:24 IST

शेतमाल विकून घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशावर चोरट्यांच्या हमखास नजरा असतात.

बाजार समिती ते बसस्थानक : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम यवतमाळ : शेतमाल विकून घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशावर चोरट्यांच्या हमखास नजरा असतात. यातून लुटमारीचे प्रकार घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी यवतमाळ बाजार समितीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती ते बसस्थानक अशी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नवनियुक्त संचालक मंडळाने या संदर्भातील प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविला आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये नवनियुक्त संचालकांनी विविध उपाय योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलले आहे. याठिकाणी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना गावी जाताना सुरक्षा मिळावी म्हणून वाहनाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. याकरीता बाजार समिती दोन वाहनाची खरेदी करणार आहे. यासंदर्भात पणन महासंघाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच मोफत वाहन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.शेतमाल विक्रीसाठी आणतांना अनेक वेळा उशीर झाल्याने शेतकऱ्यांना उपाशी झोपावे लागते. माफक दरात शेतकऱ्यांना भोजन मिळावे म्हणून बचत गटाच्या माध्यमातून झुनका भाकर केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविला आहे. पिण्याचे शुध्द पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून फिल्टर प्लान्ट या ठिकाणी बसविला जाणार आहे. प्रसाधनगृह उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाला गती मिळावी आणि शेतमालास अधिक दर मिळावा म्हणून नवीन व्यापाऱ्यांना आमंत्रण दिले जाणार आहे. बैलबाजार आणि भाजी मंडीसाठी विशेष नियोजन केले जात आहे. भाजी मंडीतील दुकानासाठी आकारलेले दर कमी करण्यात येणार आहेत. अनामत रक्कमही कमी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही अनामत रक्कम एक लाख रूपयावरून ७५ हजार रूपये करण्यात आली आहे. बाजार समितीत विविध सुविधा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)अकोलाबाजार येथे दोन आठवड्यात खरेदीयवतमाळ बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या अकोलाबाजार केंद्र तीन वर्षांपासून बंद आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी अडचणी मांडल्या. पिण्याचे पाणी, काटा आणि अस्वच्छता हे प्रमुख प्रश्न या ठिकाणी आहेत. १० ते १५ दिवसात हे प्रश्न सुटतील खरेदी नव्याने सुरू होईल. अशी माहिती ढोक यांनी ‘लोकमत’ला दिली.