शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

६५० कुटुंबांना मोफत बियाणे व खते

By admin | Updated: July 19, 2015 02:38 IST

दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ६५० कुटुंबांना शिवसेनेतर्फे मोफत बियाणे आणि खताचे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचा उपक्रम : दिवाकर रावते, संजय राठोड यांची उपस्थितीयवतमाळ : दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ६५० कुटुंबांना शिवसेनेतर्फे मोफत बियाणे आणि खताचे वाटप करण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री संजय राठोड आदींच्या उपस्थितीत दारव्हा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ना. रावते म्हणाले, पावसाअभावी राज्यातील शेतकरी भीषण संकटातून जात आहेत. अनेक ठिकाणी पेरणी उलटली, पिके करपत आहेत, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा स्थितीत कोणाची तरी भक्कम साथ शेतकऱ्यांना हवी आहे. ‘पेरते व्हा’ या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना त्यांच्या सोबत आहे, हेच सांगायला मी आज येथे आलो आहे. प्रथम शेतकरी हित ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेला अनुसरूनच राज्यातील शिवसैनिक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी परिश्रम घेत असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेतीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचा उपक्रम जिल्ह्यात १ जुलैपासून शिवसेनेतर्फे सुरू आहे. आतापर्यंत ६० च्यावर शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी पेरणी करून दिली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारून कुटुंबाला उघड्यावर पाडू नये, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात मंत्रीव्दयांच्या हस्ते लक्ष्मी धुरट, माया चव्हाण, कमला राठोड, अनंत राऊत, कमला भोकरे, सतवा चव्हाण, शांता शेरे आदी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली. तूर, सोयाबीन आणि खताच्या प्रत्येकी ६५० बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, प्रवीण शिंदे, अरविंद गादेवार, उमाकांत पापीनवार, राजेंद्र साकला, तालुका प्रमुख मनोज सिंगी, राजकुमार वानखडे, गजानन भोकरे, शहर प्रमुख सुधीर दातीर, संजय चोपडे, रवींद्र भारती, मनोज ढगले, पंडित राठोड, अजय गाडगे, महिला आघाडी प्रमुख लता चंदेल, जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, पंचायत समिती सदस्य माणिक मेश्राम, महिला आघाडी जयश्री मिरासे, साधना वाणी, आशा डोंगरे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख राजू दुधे, गजेंद्र चव्हाण, धनंजय सारखे, रवी तरटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)