शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:14 IST

यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : पहिलाच प्रयोग, केंद्रावर सर्व यंत्रणा महिलांचीच

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.या मतदान केंद्रावर सर्वच महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे केंद्राचे वैशिष्ट्य राहणार आहे. या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील टक्का वाढतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. त्यात महिलांचे मतदानाचे प्रमाण फार कमी असते. लोकशाही मार्गाने प्रस्थापित होणाऱ्या सरकारच्या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी मते नोंदवावी, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, याकरिता निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या मार्गाने आवाहन केले. तसेच जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून यावेळी निवडणुकीत खास महिलांसाठी वेगळा प्रयोग केला जात आहे.महिला मतदान केंद्रामुळे महिलांना मतदान करणे सोयीचे होणार असून महिलांची मतदानातील टक्केवारी वाढेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मतदान केंद्र राहणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर तालुक्यातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल.या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढल्यास भविष्यात असे मतदान केंद्र वाढू शकतात. त्यामुळे या केंद्रावरील महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे गरजेचे राहणार आहे.केंद्राची सुरक्षितता महत्त्वाचीमहिला मतदान केंद्र निवडताना महत्त्वाचे म्हणजे केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाºयांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड होईल, असे सांगितले जाते.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान