शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:14 IST

यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : पहिलाच प्रयोग, केंद्रावर सर्व यंत्रणा महिलांचीच

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.या मतदान केंद्रावर सर्वच महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे केंद्राचे वैशिष्ट्य राहणार आहे. या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील टक्का वाढतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. त्यात महिलांचे मतदानाचे प्रमाण फार कमी असते. लोकशाही मार्गाने प्रस्थापित होणाऱ्या सरकारच्या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी मते नोंदवावी, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, याकरिता निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या मार्गाने आवाहन केले. तसेच जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून यावेळी निवडणुकीत खास महिलांसाठी वेगळा प्रयोग केला जात आहे.महिला मतदान केंद्रामुळे महिलांना मतदान करणे सोयीचे होणार असून महिलांची मतदानातील टक्केवारी वाढेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मतदान केंद्र राहणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर तालुक्यातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल.या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढल्यास भविष्यात असे मतदान केंद्र वाढू शकतात. त्यामुळे या केंद्रावरील महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे गरजेचे राहणार आहे.केंद्राची सुरक्षितता महत्त्वाचीमहिला मतदान केंद्र निवडताना महत्त्वाचे म्हणजे केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाºयांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड होईल, असे सांगितले जाते.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान