शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

चार विधानसभा मतदारसंघांना राजकीय लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:21 IST

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांना थेट राजकीय लाभ होणार असल्याचे मानले जाते. त्यात शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघाचाही समावेश आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा : सर्व कंत्राट मुंबईत, स्थानिक नेत्यांवर केवळ गर्दीची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांना थेट राजकीय लाभ होणार असल्याचे मानले जाते. त्यात शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघाचाही समावेश आहे.मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी या कर्मभूमीतून आपल्या राज्यस्तरीय महाजनादेश यात्रेचा शुभारंभ केला. महाराष्ट्राचा नेता म्हणून मान्यता मिळविणे हा या मागे छुपा उद्देश असल्याचे मानले जाते. या यात्रेच्या शुभारंभाला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. तर समारोपाला खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ५ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जिल्ह्यात दाखल झाली. महाजनादेश यात्रेचा रथ राळेगाव, यवतमाळ आणि दारव्हा या विधानसभा मतदारसंघातून फिरला. जाताना या रथाने वणी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे दोन सर्कल कव्हर केल्याचे सांगितले जाते. राळेगावात हा रथ आल्याने व मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याने त्याचा अप्रत्यक्ष राजकीय लाभ शेजारील आर्णी विधानसभा मतदारसंघालाही कमी अधिक प्रमाणात होणार असल्याचे मानले जात आहे. या यात्रेत राळेगाव व दारव्हा येथील सभेला गर्दी दमदार होती. त्या तुलनेत जिल्ह्याचे मुख्यालय असूनही यवतमाळात तेवढी गर्दी पहायला मिळाली नसल्याचा राजकीय गोटातील सूर आहे.मुख्यमंत्र्यांच्या या महाजनादेश यात्रेत भाजपच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना केवळ कार्यकर्ते अर्थात गर्दी जमविण्याची तेवढी जबाबदारी होती. त्याचेही ‘बजेट’ जारी करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक नेत्यांवर आर्थिक बोझाही नव्हता. उर्वरित संपूर्ण कंत्राट मुंबईच्या कुण्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीला राज्यभरात महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने दोनशे ठिकाणी होणाऱ्या सभांचे वॉटर प्रुफ मंडप उभारणे, तेथे खुर्च्या लावणे, होर्डिंग फ्लेक्स, बॅनर लावणे, रथ फिरविणे आदी संपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. या प्रत्येक सभेच्या संपूर्ण खर्चाचे बजेट २५ लाखांच्या घरात असल्याचेही सांगण्यात येते. रथ यात्रेसोबत मुंबईतून पत्रकारांच्या फौजेसह नियोजन करणारे, राबणाऱ्यांचीही चमू आणली गेली होती. मूळ रथ हा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडील असल्याचे भाजपामधूनच सांगितले गेले.दोन टप्प्यात ही रथ यात्रा होणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्र्यांना ही रथ यात्रा थांबवावी लागली. आता ही रथ यात्रा पुन्हा केव्हा सुरू होणार याकडे नजरा आहेत. या रथ यात्रेने कुण्या आमदाराला आगामी निवडणुकीत नेमका काय फायदा होईल याचे अंदाज राजकीय गोटात बांधले जात आहेत. या यात्रेने शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघही ‘कव्हर’ केल्याने तेथील सेना नेत्याची मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक आणि ‘सीएमओ’तील वजन अधोरेखीत होते.तिकडे मुंबईत भाजप-सेना मुख्यमंत्री पदावरून भांडत असताना इकडे दारव्ह्यामध्ये भाजपच्या व्यासपीठावर सेनेच्या नेत्याची उपस्थिती कशी ? यावरही राजकीय गोटात चर्चा रंगताना दिसत आहे. शिवाय या संपूर्ण यात्रेत भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कुठेच पुसटसाही उल्लेख नसल्याने भाजपातील अनेकांना ही बाब खटकली.‘प्लास्टिक’मुळे मुख्यमंत्र्यांनी नाकारले स्वागताचे बुकेमहाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना स्वागतासाठी बुके देण्यात आले. मात्र प्लास्टिक बंदी असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिकयुक्त बुके स्पष्टपणे नाकारले. प्लास्टिक लागलेले बुके आणू नका अशा सूचना आधीच दिल्या गेल्या होत्या. त्यानंतरही काहींनी प्लास्टिक कॅरिबॅग असलेले बुके आणल्याने मुख्यमंत्र्यांनी ते नाकारले. एवढेच नव्हे तर जेवणाच्या पार्सलसाठी डिस्पोजल साहित्य नको असेही बजावण्यात आले होते.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राvidhan sabhaविधानसभा