शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चौपदरी रस्ता ठरला कर्दनकाळ

By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST

वणी-पडोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधकाम कंपनीतर्फे संथगतीने सुरू आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांपुढे

शेतात जाणे अवघड : जागोजागी साचले खड्डे, बियाणे-खत नेणे झाले कठीणवणी : वणी-पडोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधकाम कंपनीतर्फे संथगतीने सुरू आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़करंजी-वणी-घुग्गुस-चंद्रपूर या राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे़ करंजी ते वणी हा मार्ग तीन पदरी डांबरीकरणाचा केला जात आहे, तर वणी ते घुग्गुस हा भाग चौपदरी सिमेंट काँक्रीटचा बनवला जात आहे़ या मार्गाची उंची जमिनीपासून चार-पाच फूट वाढविण्यात आली आहे़ त्यामुळे शेतातील पाणी ठिकठिकाणी अडविले गेले आहेत़ रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या काढून पाण्याला वाट करून देणे आवश्यक होते़ मात्र रस्ता बांधकाम कंपनीने याकडे दुर्लक्ष केले़ परिणामी शेतात पाणी साचून पीक पाण्याखाली सडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ पाणी साचलेला शेतातील भाग शेतीसाठी निरूपयोगी ठरत आहे़ अनेक गावेही या रस्त्यालगत आहे़ लालगुडा-चारगावचौकी, शेलू, पुनवट या गावाला लागूनच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे़ या गावांजवळ नाल्या खोदण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे़ आता पावसाळ्यात नाल्यातील पाणी लगतच्या घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे़ ही बाब पुनवट येथील गावकऱ्यांनी सचित्र निवेदनाद्वारे बांधकाम विभाग व प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र कंपनीने त्याची अजूनही दखल घेतली नाही़ तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजक बांधण्यात आले आहे़ त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बैलगाडी व औत नेता येत नाही़ आता खरीपाच्या पेरणीची वेळ आली आहे़ शेतकऱ्यांना शेतात बियाणे, खते न्यावी लागणार आहे़ तथापि रस्ता उंच झाल्याने बियाणे, खत कोठून आणि कसे न्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांना आता पाच-सहा किलोमीटरचा फेरा मारून बैलगाडी विरूध्द मार्गाने शेतात न्यावी लागणार आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे़ मागीलवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. बांधकाम विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्याची गरज आहे. तसेच रस्ता बांधकाम कंपनीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या काढण्यास भाग पाडावे आणि रस्ता पार करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)