शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरी रस्ता ठरला कर्दनकाळ

By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST

वणी-पडोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधकाम कंपनीतर्फे संथगतीने सुरू आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांपुढे

शेतात जाणे अवघड : जागोजागी साचले खड्डे, बियाणे-खत नेणे झाले कठीणवणी : वणी-पडोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधकाम कंपनीतर्फे संथगतीने सुरू आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़करंजी-वणी-घुग्गुस-चंद्रपूर या राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे़ करंजी ते वणी हा मार्ग तीन पदरी डांबरीकरणाचा केला जात आहे, तर वणी ते घुग्गुस हा भाग चौपदरी सिमेंट काँक्रीटचा बनवला जात आहे़ या मार्गाची उंची जमिनीपासून चार-पाच फूट वाढविण्यात आली आहे़ त्यामुळे शेतातील पाणी ठिकठिकाणी अडविले गेले आहेत़ रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या काढून पाण्याला वाट करून देणे आवश्यक होते़ मात्र रस्ता बांधकाम कंपनीने याकडे दुर्लक्ष केले़ परिणामी शेतात पाणी साचून पीक पाण्याखाली सडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ पाणी साचलेला शेतातील भाग शेतीसाठी निरूपयोगी ठरत आहे़ अनेक गावेही या रस्त्यालगत आहे़ लालगुडा-चारगावचौकी, शेलू, पुनवट या गावाला लागूनच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे़ या गावांजवळ नाल्या खोदण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे़ आता पावसाळ्यात नाल्यातील पाणी लगतच्या घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे़ ही बाब पुनवट येथील गावकऱ्यांनी सचित्र निवेदनाद्वारे बांधकाम विभाग व प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र कंपनीने त्याची अजूनही दखल घेतली नाही़ तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजक बांधण्यात आले आहे़ त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बैलगाडी व औत नेता येत नाही़ आता खरीपाच्या पेरणीची वेळ आली आहे़ शेतकऱ्यांना शेतात बियाणे, खते न्यावी लागणार आहे़ तथापि रस्ता उंच झाल्याने बियाणे, खत कोठून आणि कसे न्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांना आता पाच-सहा किलोमीटरचा फेरा मारून बैलगाडी विरूध्द मार्गाने शेतात न्यावी लागणार आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे़ मागीलवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. बांधकाम विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्याची गरज आहे. तसेच रस्ता बांधकाम कंपनीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या काढण्यास भाग पाडावे आणि रस्ता पार करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)