शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

चार लाख शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि इतर पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांचा विमा उतरविला. यामध्ये पीक विमा उतरविताना शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षित करण्यासाठी कापसाला पहिले प्राधान्य दिले. त्या खालोखाल सोयाबीन आणि नंतर इतर पीक नाममात्र प्रमाणात संरक्षित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक भर कपाशीवर : तीन लाख हेक्टर संरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. ३१ जुलैपर्यंत सीएससी केंद्रांमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी तीन लाख हेक्टरवरील पीक संरक्षित केले आहे. बँकांमधील पीक कर्जधारक शेतकऱ्यांनी विमा उतरविला. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्रसिद्ध व्हायचा आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि इतर पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांचा विमा उतरविला. यामध्ये पीक विमा उतरविताना शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षित करण्यासाठी कापसाला पहिले प्राधान्य दिले. त्या खालोखाल सोयाबीन आणि नंतर इतर पीक नाममात्र प्रमाणात संरक्षित करण्यात आले आहे.याकरिता कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. जिल्ह्यातील तीन लाख ८८ हजार ३७२ बिगर कर्जदार शेतकºयांनी त्याकरिता पुढाकार घेतला. दोन लाख ७० हजार ५५२ हेक्टरवरील पीक शेतकऱ्यांनी संरक्षित केले. त्याकरिता दोन कोटी ७२ लाख ३२ हजार २९७ रूपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वर्ग केला आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनानेही याकरिता विम्याची काही रक्कम पीक विमा कंपनीकडे जमा केली आहे.मात्र नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई पोहोचती करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यापूर्वीच्या विम्याचे अनुभव वाईट आल्याने यंदा शेतकरी दक्ष आहेत.कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा गुलदस्त्यातकर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. मात्र किती शेतकऱ्यांनी विमा उतरविला याचा अहवाल अद्याप बँकांनी प्रसिद्ध केला नाही. येत्या काही दिवसात हा अहवाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती