शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यवतमाळच्या फवारणी विषबाधा प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल मॅनेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:09 IST

शासकीय यंत्रणेने यवतमाळच्या फवारणी विषबाधा प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल मॅनेज केल्याचे दिसते, असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे यांचा आरोपशासनाने शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. आता आलेल्या फॉरेन्सिक अहवालात मृतांच्या शरीरात विषाचा अंशच सापडला नसल्याचे पुढे आले आहे. पण विषबाधेसाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे अंश सापडल्याचे म्हटले आहे. यावरून शासकीय यंत्रणेने हा फॉनेन्सिक अहवालच मॅनेज केल्याचे दिसते, असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.सोमवारी यवतमाळात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मृतांच्या व्हिसेरात विष आढळले नाही, मात्र विषबाधेवर दिलेले औषध आढळले. मग डॉक्टरांनी केलेला विषबाधेचा उपचार चुकीचा समजावा काय? तसे असेल तर डॉक्टरांवर सरकार कारवाई का करीत नाही? या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकार बनवाबनवी करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नाही. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. काँग्रेस सरकारने अशा प्रत्येक संकटात शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली. आताचे भाजपा सरकार मात्र तांत्रिक निकष लावून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवत आहे.बीटीवर फवारणीची वेळ येणार नाही असा दावा असताना मारेगाव, नेर, दारव्हा परिसरात प्रचंड बोंडअळी आलेली आहे. या नुकसानीचा तत्काळ सर्वे केला पाहिजे. अर्ज भरून न घेता सरसकट मदत दिली पाहिजे. ज्या कंपन्यांनी बीटी बियाण्यांचा काळाबाजार केला, त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. कापूस, सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन येत आहे. पण राज्यशासनाने खरेदीच सुरू केली नाही. शासकीय खरेदी केंद्र वाढविण्याची गरज आहे. शिवाय कापसाला ७ आणि सोयाबीनला ५ हजार रुपये भावाप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणीही त्यांनी केली.काँग्रेस अधिवेशनावर नेणार शेतकरी दिंडीविधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतकरी, कर्मचारी, व्यापारी असे सर्व घटक भाजपा सरकारवर चिडलेले आहे. इतका गोंधळाचा कारभार राज्यात मी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांची दिंडी नेण्यात येणार आहे. त्यासाठीच मंगळवारी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होत असून त्यात मोर्चाबाबत अंतिम निर्णय होईल. मराठवाडा, खान्देश, विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या दिंड्या गावागावातून नागपुरात धडकतील. त्यानंतर या दिंड्या एकत्र येऊन विधानसभेवर शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा धडक देईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी