शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या फवारणी विषबाधा प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल मॅनेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:09 IST

शासकीय यंत्रणेने यवतमाळच्या फवारणी विषबाधा प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल मॅनेज केल्याचे दिसते, असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे यांचा आरोपशासनाने शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. आता आलेल्या फॉरेन्सिक अहवालात मृतांच्या शरीरात विषाचा अंशच सापडला नसल्याचे पुढे आले आहे. पण विषबाधेसाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे अंश सापडल्याचे म्हटले आहे. यावरून शासकीय यंत्रणेने हा फॉनेन्सिक अहवालच मॅनेज केल्याचे दिसते, असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.सोमवारी यवतमाळात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मृतांच्या व्हिसेरात विष आढळले नाही, मात्र विषबाधेवर दिलेले औषध आढळले. मग डॉक्टरांनी केलेला विषबाधेचा उपचार चुकीचा समजावा काय? तसे असेल तर डॉक्टरांवर सरकार कारवाई का करीत नाही? या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकार बनवाबनवी करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नाही. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. काँग्रेस सरकारने अशा प्रत्येक संकटात शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली. आताचे भाजपा सरकार मात्र तांत्रिक निकष लावून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवत आहे.बीटीवर फवारणीची वेळ येणार नाही असा दावा असताना मारेगाव, नेर, दारव्हा परिसरात प्रचंड बोंडअळी आलेली आहे. या नुकसानीचा तत्काळ सर्वे केला पाहिजे. अर्ज भरून न घेता सरसकट मदत दिली पाहिजे. ज्या कंपन्यांनी बीटी बियाण्यांचा काळाबाजार केला, त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. कापूस, सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन येत आहे. पण राज्यशासनाने खरेदीच सुरू केली नाही. शासकीय खरेदी केंद्र वाढविण्याची गरज आहे. शिवाय कापसाला ७ आणि सोयाबीनला ५ हजार रुपये भावाप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणीही त्यांनी केली.काँग्रेस अधिवेशनावर नेणार शेतकरी दिंडीविधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतकरी, कर्मचारी, व्यापारी असे सर्व घटक भाजपा सरकारवर चिडलेले आहे. इतका गोंधळाचा कारभार राज्यात मी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांची दिंडी नेण्यात येणार आहे. त्यासाठीच मंगळवारी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होत असून त्यात मोर्चाबाबत अंतिम निर्णय होईल. मराठवाडा, खान्देश, विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या दिंड्या गावागावातून नागपुरात धडकतील. त्यानंतर या दिंड्या एकत्र येऊन विधानसभेवर शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा धडक देईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी