शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शेतात शिरलेल्या वाघाने केला शेतकºयाचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:06 IST

वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला.

ठळक मुद्देडोंगरगाव जंगलातील थरार : दोन वर्षात घेतला दोघांचा बळी, आठ जणांना केले गंभीर जखमी

विठ्ठल पाईलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कझरी : वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला. या घटनेने आता पंचक्रोशी दहशतीखाली वावरत आहे.रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील नामदेव तानबा राऊत हे आपल्या शेताची रखवाली करण्यासाठी जंगला शेजारी असलेल्या शेतात जागली गेले. या दरम्यान, शेतात एक पट्टेदार वाघ शिरला. वाघाला पाहून घाबरलेल्या नामदेवरावांनी हिम्मत एकवटून वाघाला शेतातून हुसकावून लावणाचा प्रयत्न केला. मात्र वाघ तो वाघच शेवटी. वाघाने थेट नामदेवरावांवर चाल केली. त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे जीव वाचवित त्यांनी शेतातील माळोशी (आटारी) वर चढून आरडाओरड सुरू केली. आजुबाजूच्या शेतातील लोक आवाजाने धावून आले. एकच हलकल्लोळ उडाला. त्यामुळे वाघानेही माघार घेत तेथून जंगलाकडे धूम ठोकली.तालुक्यातील डोंगरगाव परिसरात वाघाने दोन वर्षापूर्वी एकाचा जीव घेतला होता. या घटनेनंतर अद्यापही हल्लेखोर वाघ याच भागात असून यामुळे शेतकरी वर्गात दहशत पसरली आहे. तालुक्यातील पवनार, डोंगरगाव हा जंगली व बंदी भाग आहे. वाघासाठी या भागात पाण्याचे स्रोतही आहेत. त्यामुळे वाघ या परिसरात भटकत असतो. अनेक पाळीव प्राणीही या वाघाने फस्त केले आहे. याबाबत नामदेव राऊत यांचा मुलगा पवन याने वनविभागाला माहिती दिली. मात्र अद्यापही वन विभागातर्फे वाघाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना आरंभल्या नाहीत. या परिसरात अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या भागात वाघ-मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यातून जनक्षोभ उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.हा परिसर जंगलाने व्यापला असून या भागात वन्यजीवांची संख्या मोठी आहे. येथे बिबटाचाही वापर आहे.वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी दहशतझरी तालुक्यात आतापर्यंत दुभाटी येथील एक महिला व डोंगरगाव येथील एक पुरुष या हल्ल्यात ठार झाले, तर शिबला येथील एक इसम गंभीर जखमी झाला. या घटनेच्या भयातून आताही त्यांचे कुटुंब सावरले नाही. मांगली व हिरापूर येथील तिघांना एकाच दिवशी वाघाने जखमी केल्याची घटना ताजी आहे. मार्की येथेही शेतात काम करताना चौघावर वाघाने हल्ला चढविला होता. दिवसेंदिवस वाघाचे वाढणारे हल्ले बघता वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.