शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मराठीच्या भल्यासाठी ‘लोकमत’चा दीड वर्षापासून पाठपुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 06:50 IST

मुख्यमंत्रीही सकारात्मक : विजय दर्डा यांनी धरला होता शिक्षणमंत्र्यांकडे आग्रह

यवतमाळ : महाराष्ट्रातच मराठीची पिछेहाट अशोभनीय असून राज्यात प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे अनिवार्य करावे, असा आग्रह लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी गेल्या दीड वर्षांपासून धरला आहे. दीड वर्षापूर्वी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापुढे ही मागणी मांडली होती. आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सर्व शाळांना मराठी शिकविण्याबाबत खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे मराठी अध्ययन-अध्यापनाला गतवैभव प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

२० जानेवारी २०१८ रोजी शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या समस्यांसदर्भात यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटी) ही बैठक बोलाविली होती. बैठकीत बोलताना विजय दर्डा यानी महाराष्ट्रातच मराठीची अवस्था वाईट झाल्याची खंत व्यक्त करून ‘केजी’पासून ‘बारावी’पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये मराठीतून शिक्षण देणे बंधनकारक करावे, अशी मागणी केली. आपली शिक्षण पद्धती अमेरिकन पॅटर्ननुसार सुरू आहे. मात्र, अमेरिकन पॅटर्नही आपण पूर्णपणे स्वीकारलेला नाही अन् भारतीय पॅटर्नही पूर्णपणे घेतलेला नाही. आता आपल्याला चायना पॅटर्नकडे जाण्याची गरज आहे. विद्यार्थी केवळ ‘जॉब ओरिएन्टेड’ होताहेत. ‘इनोव्हेशन’ची कमतरता दिसते. आजच्या काळात कौशल्य महत्त्वाचे आहे. कौशल्यावर आधारित शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने उच्च शिक्षण घेऊनही बेकारी वाढत आहे. शिक्षण विभागाने यात बदल करावा, अशी अपेक्षाही विजय दर्डा यांनी व्यक्त केली होती.

मंत्री महोदय,‘ते’ पत्र कुठे हरवले?यवतमाळ बैठकीत तावडे म्हणाले होते, सीबीएसई, आयसीएसई अशा सर्व मंडळांच्या शाळांना पहिली ते आठवीपर्यंत त्रिभाषा सूत्र बंधनकारक आहे. स्थानिक मातृभाषा शिकवणे आवश्यक आहे. त्यानुसारच त्यांना ‘एनओसी’ दिली जाते. शैक्षणिक सत्राच्या पूर्वीच शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना पत्र पाठवून त्रिभाषा सूत्र अमलात आणण्याविषयी बजावले जाईल.शिवाय, मराठी भाषाशिकविली जाते किंवा नाही, याबाबतही तपासणी केली जाईल. मात्र आता २०१८-१९ हे सत्र संपले,तरी शिक्षण विभागाकडूनत्रिभाषा सूत्रांच्या अमलबजावणीचे पत्र शाळांना पोहोचलेले नाही. शिवाय, शाळांमध्ये तपासणीही झालेली नाही. किमान २०१९-२० या सत्रात तरी त्रिभाषा सूत्राचे पत्र शाळांमध्ये पोहोचावे, अशी अपेक्षा आहे.तावडे म्हणाले होते... मातृभाषा डोळे तर इंग्रजी केवळ चष्माजानेवारी २०१८ मध्ये यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘युफोरिया’ स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले होते, बालमानसशास्त्रानुसार मुले मातृभाषेतूनच जास्त चांगल्या पद्धतीने ज्ञान ग्रहण करू शकतात. मातृभाषा ही डोळे आहे, तर इंग्रजी चष्मा आहे. चष्म्याने चांगले दिसते. पण डोळेच नसतील तर चष्म्याचा उपयोग काय? त्यामुळेच दोन वर्षांत २५ हजार विद्यार्थी इंग्रजी शाळा सोडून मराठी शाळांमध्ये परतले आहेत.सकारात्मक परिणाम दृष्टिपथातजानेवारी २०१८ पासून ‘लोकमत’ने मराठीबाबत सतत आवाज उठविला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यात एका शाळेचे अलिकडेच उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित विजय दर्डा यांनी मराठीच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा त्यांच्यापुढे मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक शाळेला मराठी शिकविणे आवश्यक असल्याचे सांगितले. केवळ आठवीपर्यंतच नव्हे, तर त्यापुढील वर्गांनाही मराठी शिकविलीच पाहिजे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांना दिला आहे.

टॅग्स :marathiमराठीLokmatलोकमत