तीन लाखांचा निधी : अशोक उईके यांच्या उपस्थितीत बैठककळंब : शहरातून चक्रवती नदी वाहत असतानाही शहरवासीयांना अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यापुढे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चक्रवती नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. शनिवारी तहसील कार्यालयात शहरातील सर्वपक्षीय व मान्यवर मंडळीची सभा आयोजित करण्यात आली होती. आमदार डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात ‘चक्रवती नदी पुनर्जीवन समिती’ स्थापन करण्यात आली. यावेळी अनेकांनी स्वयंस्फुर्तीने आपली आर्थिक मदत जाहीर करुन लोकसहभाग दर्शविला. आमदार अशोक उईके यांनी एक महिन्याचा ७५ हजार रुपये पगार देण्याचे जाहीर करताच अनेकांनी आपला वाटाही जाहीर केला. यामध्ये उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, तालुका कृषी अधिकारी के.बी.आठवले, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, उपनगराध्यक्ष मनोज काळे, पंचायत समितीचे उपसभापती विजय गेडाम, नगरसेवक राजेश मांडवकर, चंद्रशेखर चांदोरे, फारुक सिद्धिकी, राजेंद्र हारगुडे, राजाभाऊ तांबेकर, भाऊ गवळी, गौरीशंकर लाखीयाँ, प्रकाश उमरतकर आदीसह अनेकांनी आर्थिक सहकार्य जाहीर केले. विशेष म्हणजे एका दिवसात ३ लाखांच्या वर निधी गोळा झाला. त्यामुळे येणाऱ्या काळात ही लोकचळवळ निर्माण होणार आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यू.व्ही.राऊत, सहायक गटविकास अधिकारी पद्माकार मडावी, नायब तहसीलदार राजेश पऊळ, भाविक भगत, नगरपंचायतचे मुख्याधिकारी एम.एस.व्यवहारे, बांधकाम सभापती आशिष धोबे, आरोग्य सभापती सुनिता डेगमवार, तालुका निबंधक राजेश गुर्जर, सुरेश केवटे, ज्ञानेश्वर येवले, राजेश चौधरी, कैलास बोंदरे, प्रशांत ओंकार, संजय दरणे, रुपेश राऊत, रमेश धोटे, अनिल नवाडे, नीलेश मेत्रे, मारोती वानखडे आदी उपस्थित होते. एकाच दिवसात तीन लाखांवर निधी गोळा झाल्याने लोक सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही लोकचळवळ यशस्वी होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘चक्रवती’च्या पुनर्जीवनासाठी लोकचळवळ उभी राहणार
By admin | Updated: May 1, 2016 02:32 IST