शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

चारा, पाण्यासाठी वन्यजीवांची गावांकडे धाव

By admin | Updated: March 11, 2015 01:54 IST

जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दारव्हा : जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोही, रानडुक्कर, हरीण, लांडगा, माकड आदी वन्यजीवांनी वनालगतच्या शेतांमध्ये उच्छाद मांडला आहे. उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. अनेकांची रबी पिके धोक्यात आली आहे. माकडं शहरात शिरून घरावर वाळविण्यासाठी टाकलेल्या साहित्याची नासधूस करतात. उन्हाळा सुरू झाल्याने महिला विविध प्रकारचे पदार्थ तयार करून घराच्या गच्चीवर वाळविण्यासाठी घालतात. हे पदार्थ माकड फस्त करून टाकतात. हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येण्यास मागेपुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी माकडाने काही जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. बीबट यासारखे हिंस्त्र प्राणीही गावालगत आढळतात. गेली काही दिवसात तालुक्यात तीन बीबट मरण पावले. या घटना गावालगतच घडल्या. त्यामुळे चारा, पाण्याच्या शोधात वन्यजीव आता गावाकडे भटकत असल्याचे स्पष्ट होते. जंगलातच वन्यजिवांसाठी चारा, पाण्याची सोय व्हावी यासाठी विविध योजना राबविल्या जातात. वनविभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च यावर केला जातो. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)