शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

चारा, पाण्यासाठी वन्यजीवांची गावांकडे धाव

By admin | Updated: March 11, 2015 01:54 IST

जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दारव्हा : जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोही, रानडुक्कर, हरीण, लांडगा, माकड आदी वन्यजीवांनी वनालगतच्या शेतांमध्ये उच्छाद मांडला आहे. उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. अनेकांची रबी पिके धोक्यात आली आहे. माकडं शहरात शिरून घरावर वाळविण्यासाठी टाकलेल्या साहित्याची नासधूस करतात. उन्हाळा सुरू झाल्याने महिला विविध प्रकारचे पदार्थ तयार करून घराच्या गच्चीवर वाळविण्यासाठी घालतात. हे पदार्थ माकड फस्त करून टाकतात. हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येण्यास मागेपुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी माकडाने काही जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. बीबट यासारखे हिंस्त्र प्राणीही गावालगत आढळतात. गेली काही दिवसात तालुक्यात तीन बीबट मरण पावले. या घटना गावालगतच घडल्या. त्यामुळे चारा, पाण्याच्या शोधात वन्यजीव आता गावाकडे भटकत असल्याचे स्पष्ट होते. जंगलातच वन्यजिवांसाठी चारा, पाण्याची सोय व्हावी यासाठी विविध योजना राबविल्या जातात. वनविभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च यावर केला जातो. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)