शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दिग्रस तालुक्यात चाराटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 21:54 IST

तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने तालुक्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस काढली असली तरी ग्राहक शोधूनही सापडत नाही. संकटकाळी पशुधन विकून काम भागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळामुळे पशुधन वाऱ्यावर : बाजारात गुरांची गर्दी, मात्र ग्राहक शोधूनही मिळेना

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने तालुक्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस काढली असली तरी ग्राहक शोधूनही सापडत नाही. संकटकाळी पशुधन विकून काम भागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विहिरी, नदी, नाले कोरडे पडले आहे. पाण्याचे संकट भीषण झाले आहे. त्यातच गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पीक उत्पादन घटले आहे. रबी हंगामात अनेकांनी शेती पडीत ठेवली. त्यामुळे जनावरांसाठी वैरण निर्मिती झाली नाही. आता उन्हाळा सुरू होताच पशुपालकांना चाराटंचाईचाही सामना करावा लागत आहे. नाईलाजाने जीवापाड जपलेली बैलजोडी विकण्याचा प्रसंग ओढवला आहे. शासनाने गोवंशाची हत्त्या करण्यावर बंदी घातल्यामुळे जनावरांची खरेदी बरीच कमी झाली आहे. दिग्रससह जिल्ह्यातील नेरच्या बाजारात जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे.भाव घसरलेएकंदर दुष्काळामुळे बाजारात जनावरांचे भावही घसरले आहे. साधारणत: ७० ते ८० हजार किमत असलेली बैलजोडी आता ४० ते ५० हजार रुपयांना विकली जात आहे.चारा नाही, पाणी नाही. त्यामुळे बैलजोडी विक्रीला आणली. मात्र ग्राहकच सापडत नाही. या टंचाईचा आणखी किती दिवस सामना करावा.- महादेव भालेरावपशुपालक, फेट्री