शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, शिक्षण, शेतीवर राहणार ‘फोकस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:23 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पाणीटंचाई, शिक्षण हे विषय माझ्या प्राधान्यक्रमावर राहील. सोबतच शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित जे-जे करता येईल, ते अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न राहील, असे मत जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केले.सोमवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जलज शर्मा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मावळते सीईओ ...

ठळक मुद्देजलज शर्मा : जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओंनी स्वीकारला पदभार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पाणीटंचाई, शिक्षण हे विषय माझ्या प्राधान्यक्रमावर राहील. सोबतच शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित जे-जे करता येईल, ते अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न राहील, असे मत जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केले.सोमवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जलज शर्मा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मावळते सीईओ दीपक सिंगला यांच्याकडून पदभार स्वीकारला. मूळचे हरियाणा येथील जलज शर्मा यांनी बी.टेक., कम्प्यूटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. २०११ मध्ये पहिल्यांदा त्यांची भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) निवड झाली होती. तर २०१४ मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षेत यश मिळविले. कोल्हापूरमध्ये प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जळगावमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. तर आता यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रूजू झाले आहेत.पदभार स्वीकारल्यावर जलज शर्मा म्हणाले, जळगावमध्ये माझ्याकडे केवळ दोनच तालुक्यांचे काम होते. पण यवतमाळ हा १६ तालुक्यांचा मोठा जिल्हा आहे. येथील प्रश्न कोणते आहे, याचा अभ्यास करावा लागणार आहे. पाणीटंचाई, शिक्षण हे विषय तर महत्त्वाचे आहेच. पण गेल्या ३-४ वर्षांपासून मी येथील शेतकरी आत्महत्या या गंभीर प्रश्नाबाबत ऐकतोय. शेतकºयांशी संबंधित काही उपक्रम हे महसूल विभागाकडे आहेत. तर काही उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविले जातात. शेतकºयांसाठी जिल्हा परिषदेतून जे-जे चांगले करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. शासनाच्या सर्व योजना प्रभाविपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही शर्मा यांनी दिली.मावळते सीईओ दीपक सिंगला म्हणाले, पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत स्तरावर आम्ही मोठे काम सुरू केले आहे. ती कामे पूर्णत्वास गेली आणि यंदा पाऊस चांगला झाला तर जिल्ह्यात पुढील ३-४ वर्षे पाण्याची टंचाई निर्माणच होणार नाही.