शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर नळाच्या पाण्याची वाहतेय गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे.

ठळक मुद्देनागरिक पाण्यापासून वंचित । दोन आठवड्यांपासून नळाला थेंबही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्लक्षितपणाची मालिकाच जणू या विभागाने सुरू केली आहे. विविध तांत्रिक कारणे पुढे करून पाणीपुरवठ्यात अनियमितता आणली गेली आहे. आता प्राधिकरणानेच केलेल्या कामामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. बाजोरियानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील शेकडो नागरिक या प्रश्नाचे बळी पडले आहेत.नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे. नळालाच पाणी नसल्याने त्यांना भटकंती करावी लागत आहे. हातपंप, विहीर आदी स्रोत घराच्या आसपास नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी प्राधिकरणावर आपला रोष व्यक्त केला. मात्र या विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेतली नाही.खोदकाम करत असताना घरगुती पाईपलाईन फुटू नये यासाठी कुठलीही दक्षता घेतली जात नाही. शहराच्या अनेक भागातील नागरिकांना या प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. विकास कामे करताना नागरिकांची साथ मिळत असली तरी त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभाग उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामातही असाच प्रकार सुरू आहे. संबंधित अभियंत्यांना सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा बांध फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अभियंत्यांची टोलवाटोलवीयवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या परिसरासाठी अभियंत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चापडोह प्रकल्पावरून घेतलेले पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेले अभियंता तर चक्क वॉलमनचे नाव सांगून मोकळे होतात. कुठलीही तक्रार ते गांभीर्याने घेत नाहीत.

टॅग्स :Waterपाणी