शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर नळाच्या पाण्याची वाहतेय गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे.

ठळक मुद्देनागरिक पाण्यापासून वंचित । दोन आठवड्यांपासून नळाला थेंबही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्लक्षितपणाची मालिकाच जणू या विभागाने सुरू केली आहे. विविध तांत्रिक कारणे पुढे करून पाणीपुरवठ्यात अनियमितता आणली गेली आहे. आता प्राधिकरणानेच केलेल्या कामामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. बाजोरियानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील शेकडो नागरिक या प्रश्नाचे बळी पडले आहेत.नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे. नळालाच पाणी नसल्याने त्यांना भटकंती करावी लागत आहे. हातपंप, विहीर आदी स्रोत घराच्या आसपास नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी प्राधिकरणावर आपला रोष व्यक्त केला. मात्र या विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेतली नाही.खोदकाम करत असताना घरगुती पाईपलाईन फुटू नये यासाठी कुठलीही दक्षता घेतली जात नाही. शहराच्या अनेक भागातील नागरिकांना या प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. विकास कामे करताना नागरिकांची साथ मिळत असली तरी त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभाग उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामातही असाच प्रकार सुरू आहे. संबंधित अभियंत्यांना सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा बांध फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अभियंत्यांची टोलवाटोलवीयवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या परिसरासाठी अभियंत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चापडोह प्रकल्पावरून घेतलेले पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेले अभियंता तर चक्क वॉलमनचे नाव सांगून मोकळे होतात. कुठलीही तक्रार ते गांभीर्याने घेत नाहीत.

टॅग्स :Waterपाणी