शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कळंब येथे आगीत तीन घरे भस्मसात

By admin | Updated: February 9, 2016 02:06 IST

येथील प्रेमनगर परिसरात लागलेल्या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली.

वासराचा मृत्यू : एक लाखावर नुकसान कळंब : येथील प्रेमनगर परिसरात लागलेल्या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली. तर एक वासरु आणि कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लागली. गावकरी आणि अग्नीशमन दलाने या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.या आगीत अनिल नारायण येकणार यांचे घर जळून भस्मसात झाले. त्यात रोख ३५ हजार रुपये व मौल्यवान साहित्य असे ७० हजारांचे नुकसान झाले. तसेच एक वासरु आणि तीन कोंबड्याही मृत्युमुखी पडल्या. लगतचे सुधाकर मोरे आणि तुळशीराम मोरे यांच्या घरालाही आगीची झळ पोहोचली. आग लागताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळविण्यात आले. आगीची माहिती मिळताच तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगग्रस्तांना शासकीय मदत आणि धान्याचे वाटप करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी नगराध्यक्ष दिगंबर मस्के, उपाध्यक्ष मनोज काळे, बांधकाम सभापती आशिष धोबे, पोलीस उपनिरीक्षक संघरक्षक भगत, नगरसेवक राजू पड्डा, मारोती वानखडे, योगेश धांदे, समीर शेख आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)