शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

स्वातंत्र्यानंतर प्रथमच ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:12 IST

तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला.

ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील गोरेगाव : ग्रामपंचायतच्या स्वतंत्र वास्तूला मिळाला मान

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला.सन १९६२ मध्ये गोरेगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली. मात्र स्वतंत्र वास्तू नसल्यामुळे सर्व कारभार गावातील शाळेच्या इमारतीतून सुरू होता. त्यामुळे आत्तापर्यंत ग्रामपंचायतीत स्वतंत्र असा कोणताही कार्यक्रम साजरा झाला नाही. १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी देशातील सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था आदींसह विविध कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकविला जातो. एवढेच नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्याचा हा उत्सव देशातील सर्व नागरिकांना साजरा करता यावा म्हणून सर्वांनाच राष्ट्रध्वज फडकविण्याचा अधिकार देण्यात आला. शासकीय कार्यालयांमध्ये तर ध्वजारोहणाचा मान मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. याकरिता अनेकदा वादही उत्पन्न होतात. मात्र तालुक्यातील १९६२ मध्ये स्थापन झालेल्या गोरेगाव ग्रामपंचायतीवर आजपर्यंत कधीच राष्ट्रध्वज न फडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गोरेगाव येथे आत्तापर्यंत ग्रामपंचायतीला स्वतंत्र इमारत नव्हती. त्यामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून ग्रामपंचायतीचा कारभार हाकला जात होता. तेथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहणाचा मान मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना मिळत होता. त्यामुळे गेली अनेक वर्षे गावातील अनेक सरपंच या सन्मानापासून वंचित राहिले. पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची स्वतंत्र वास्तू बांधण्यात आली. मात्र आत्तापर्यंत तेथे ध्वजारोहणाचा स्वतंत्र कार्यक्रम झालाच नाही. यावर्षी प्रथमच ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. १५ आॅगस्टला सरपंच सुनिता मनोहर पवार यांनी प्रथमच ध्वजारोहण केले. याप्रसंगी उपसरपंच मिराबाई खराटे, ग्रामपंचायत सदस्य किशोर महिंद्रे, सुनील माळवे, शारदाबाई डाखोरे, सीमाताई ठाकरे, उमेश उगम, पोलीस पाटील प्रदीप मुंढे, मुख्याध्यापक कुलानंद गायकवाड, शिक्षक शैलेश चिरडे, शीतल डोळस आदी उपस्थित होते. गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला.आत्तापर्यंत ध्वजारोहण का झाले नाही?स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकला नाही. परिणामी आत्तापर्यंतच्या सर्वच सरपंचांना राष्ट्रध्वज फडकविण्याचा सन्मान मिळाला नाही. त्यांना या सन्मानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पंचायत समितीशी संपर्क केला. मात्र पंचायत समिती स्तरावरून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. तेथील ग्रामसेवक पी.एस.मानकर यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसgram panchayatग्राम पंचायत