शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:58 IST

वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.

ठळक मुद्देएचव्हीडीएस कुचकामी : दुष्काळात शेतकऱ्यांपुढे नवे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. हे सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सिंचन विहिरींवर आहे. धडक सिंचन योजनेच्या विहिरीसोबत शेतकऱ्यांनी स्वत: कर्ज काढून विहिरीचे काम पूर्ण केले. यामुळे सिंचन करता येणार असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात सिंचन विहिरी पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. यातून शेतकºयांपुढील अडचणीत भर पडली आहे.वीज वितरण कंपनीने मार्च २०१८ पर्यंतच वीज जोडणीचे अर्ज स्वीकारले आहेत. यानंतर दिले जाणारे अर्ज आॅनलाईन यंत्रणेवर स्वीकारलेच जात नाही. यामुळे यानंतरच वीज जोडणी संख्या गुलदस्त्यात आहे. सन २०१६ ते २०१८ पर्यंतचे वीज जोडणीचे सहा हजार ८८७ अर्ज वीज वितरण कंपनीकडे आले आहे. या शेतकºयांना एचव्हीडीएस योजनेतून जोडण्या दिल्या जाणार होत्या. त्याकरिता वीज वितरण कंपनीने योजनाही जाहीर केली. या योजनेत वीज जोडणी करताना एक शेतकरी एक डीपी असा नियम जाहीर करण्यात आला. जितके अर्ज तितक्याच डीपी शेतकऱ्यांना लागणार होत्या.त्याचे कंत्राट त्रयस्त संस्थेकडे देण्यात आले. या संस्थेने तत्काळ डीपी पुरवठा करण्याचा शब्द वीज कंपनीला दिला होता. प्रत्यक्षात या डीपी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत. दुष्काळी स्थितीत पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा कृषीपंपाच्या वीज जोडण्या तत्काळ सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी वीज कंपनीकडे येरझारा सुरू केल्या आहेत. मात्र डीपीच उपलब्ध नाही. यामुळे वीज जोडण्या आता थांबल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळातही महावितरणची यंत्रणा शेतकºयांना आणखी अडचणीत आणण्याचे काम करीत आहे.एचव्हीडीएस योजनेतून ८१७ वीज जोडण्यावीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एचव्हीडीएस योजनेतून आतापर्यंत ८१७ वीज जोडण्या करून दिल्या आहेत. तर २१० वीज जोडण्या प्रगतीपथावर आहे. यानंतरही जवळपास पाच हजार जोडण्या प्रलंबित आहेत.वीज जोडणी करण्याचे काम कंपनीने युध्दपातळीवर सुरू केले आहे. वीज जोडणीसाठी लागणाºया डीपी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. त्यानुसार जोडणीचे काम करण्यात आले आहे.- सुरेश मडावीअधीक्षक, अभियंतावीज वितरण कंपनी

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज