शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:58 IST

वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.

ठळक मुद्देएचव्हीडीएस कुचकामी : दुष्काळात शेतकऱ्यांपुढे नवे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. हे सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सिंचन विहिरींवर आहे. धडक सिंचन योजनेच्या विहिरीसोबत शेतकऱ्यांनी स्वत: कर्ज काढून विहिरीचे काम पूर्ण केले. यामुळे सिंचन करता येणार असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात सिंचन विहिरी पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. यातून शेतकºयांपुढील अडचणीत भर पडली आहे.वीज वितरण कंपनीने मार्च २०१८ पर्यंतच वीज जोडणीचे अर्ज स्वीकारले आहेत. यानंतर दिले जाणारे अर्ज आॅनलाईन यंत्रणेवर स्वीकारलेच जात नाही. यामुळे यानंतरच वीज जोडणी संख्या गुलदस्त्यात आहे. सन २०१६ ते २०१८ पर्यंतचे वीज जोडणीचे सहा हजार ८८७ अर्ज वीज वितरण कंपनीकडे आले आहे. या शेतकºयांना एचव्हीडीएस योजनेतून जोडण्या दिल्या जाणार होत्या. त्याकरिता वीज वितरण कंपनीने योजनाही जाहीर केली. या योजनेत वीज जोडणी करताना एक शेतकरी एक डीपी असा नियम जाहीर करण्यात आला. जितके अर्ज तितक्याच डीपी शेतकऱ्यांना लागणार होत्या.त्याचे कंत्राट त्रयस्त संस्थेकडे देण्यात आले. या संस्थेने तत्काळ डीपी पुरवठा करण्याचा शब्द वीज कंपनीला दिला होता. प्रत्यक्षात या डीपी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत. दुष्काळी स्थितीत पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा कृषीपंपाच्या वीज जोडण्या तत्काळ सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी वीज कंपनीकडे येरझारा सुरू केल्या आहेत. मात्र डीपीच उपलब्ध नाही. यामुळे वीज जोडण्या आता थांबल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळातही महावितरणची यंत्रणा शेतकºयांना आणखी अडचणीत आणण्याचे काम करीत आहे.एचव्हीडीएस योजनेतून ८१७ वीज जोडण्यावीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एचव्हीडीएस योजनेतून आतापर्यंत ८१७ वीज जोडण्या करून दिल्या आहेत. तर २१० वीज जोडण्या प्रगतीपथावर आहे. यानंतरही जवळपास पाच हजार जोडण्या प्रलंबित आहेत.वीज जोडणी करण्याचे काम कंपनीने युध्दपातळीवर सुरू केले आहे. वीज जोडणीसाठी लागणाºया डीपी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. त्यानुसार जोडणीचे काम करण्यात आले आहे.- सुरेश मडावीअधीक्षक, अभियंतावीज वितरण कंपनी

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज