शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वाघाला पकडण्यासाठी पाच पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:07 IST

नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी अखेर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वन विभागाच्या पाच रेस्क्यू टीम सखी जंगलात दाखल झाले आहे.

ठळक मुद्देसात पिंजरे व तीन मचान : सखी येथे शोकाकूल वातावरणात सतीश कोवेवर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/राळेगाव : नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी अखेर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वन विभागाच्या पाच रेस्क्यू टीम सखी जंगलात दाखल झाले आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणावर शोकाकूल वातावरणात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत सहा बळी घेतल्याने संतप्त गावकºयांनी वन विभागावर रोष व्यक्त करीत उपविभागीय महसूल अधिकाºयाचे शासकीय वाहन शनिवारी रात्री पेटवून दिले होते. दरम्यान, गावातील तणाव निवळला असला तरी परिसरातील दहा गावांमध्ये वाघाची दहशत कायमच आहे.गत वर्षभरापासून राळेगाव तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या जंगलात वाघाची दहशत आहे. आतापर्यंत या वाघाने सहा जणांचा बळी घेतला आहे. शनिवारी सखी येथील सतीश पांडुरंग कोवे (१९) या तरुणावर हल्ला करून त्याला ठार केले. त्याचा मृतदेह ३०० मीटरपर्यंत फरफटत नेला. वाघाचे सातत्याने हल्ले होत असताना वन विभाग मात्र कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने सखी येथील गावकरी संतप्त झाले. याच रोषाचा सामना उपविभागीय महसूल अधिकारी संदीपकुमार अपार यांना करावा लागला. ते आपल्या शासकीय वाहनाने सखी येथे शनिवारी रात्री गेले होते. त्यावेळी वन विभागाचे वाहन समजून गावकºयांनी त्यांच्याच वाहनाला पेटवून दिले. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठांनी सखीकडे धाव घेतली. गावकºयांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर रात्री जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमिष मानकर, राळेगाव पंचायत समितीचे माजी सभापती अशोक केवटे, कृष्णापूरचे सरपंच भीमराव बोटोणी, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय तेलंग, अरविंद फुटाणे, जया रागिनवार, दत्तात्रय देशमुख, भीमराव पुरके यांनी गावकºयांची समजूत काढली. त्यानंतर रात्रीच सतीश कोवे याचा मृतदेह एका ट्रॅक्टरमधून राळेगावला शवविच्छेदनासाठी रवाना केला.दरम्यान, वन विभागाने या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. प्रधान वन्यजीव विभागाकडून वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच अमरावती, बुलडाणा, मेळघाट आणि चंद्रपूरवरून पाच रेस्क्यू पथक पाचारण करण्यात आले आहे. तसेच वाघाला पकडण्यासाठी सात पिंजरे, दहा सीसीटीव्ही कॅमेरे, तीन मचान पुरविण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे. वन विकास महामंडळाचे मुख्य वनसंरक्षक त्रिपाठी, यवतमाळ मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण आणि वन विकास महामंडळाचे उपवनसंरक्षक व्ही.एन. पुनसे या परिसरात दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वन विभागाने सात ट्रॅप कॅमेरे लावले होते. परंतु त्यात वाघ दिसला नाही. २३ आॅगस्ट रोजी गजानन पवार या तरुणाचा वाघाने बळी घेतला. दुसºया दिवशी बंदर शिवारात गोºह्याची शिकार केली. यावेळी पगमार्कवरून नर आणि मादी असे दोन वाघ असल्याचे स्पष्ट झाले होते. हे जंगल घनदाट असून १५ किलोमीटर परिघात आहे.१०० तरुणांचे पथक तयार करण्यासाठी विशेष प्रतिसाद नाहीतणावात शवविच्छेदनवाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या सतीश कोवे याचा मृतदेह गावकºयांची समजूत काढून राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रविवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. वन विभागाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करीत होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सखी येथे दुपारी सतीशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार हेमंत गांगुर्डे व पोलीस उपस्थित होते. यावेळी सतीशच्या नातेवाईकांचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. प्रत्येकजण रोष व्यक्त करीत होता.यांचा गेला बळीराळेगाव तालुक्यात वर्षभरात वाघाने सहा जणांचा बळी घेतला. त्यात सोनाबाई वामन घोसले रा.सराटी, सखाराम लक्ष्मण टेकाम रा.झोटींगधरा, मारुती विठोबा नागोसे रा.खैरगाव, प्रवीण पुंडलिक सोनोने रा.तेजनी, गजानन शामराव पवार रा.सराटी आणि आता शनिवारी सतीश पांडुरंग कोवे रा.सखी यांचा समावेश आहे. सोबतच वाघाने अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी-शेतमजूर आणि गुराखी जंगलात जाण्यासाठी घाबरत आहेत.