शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

वाघाला पकडण्यासाठी पाच पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:07 IST

नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी अखेर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वन विभागाच्या पाच रेस्क्यू टीम सखी जंगलात दाखल झाले आहे.

ठळक मुद्देसात पिंजरे व तीन मचान : सखी येथे शोकाकूल वातावरणात सतीश कोवेवर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/राळेगाव : नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी अखेर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वन विभागाच्या पाच रेस्क्यू टीम सखी जंगलात दाखल झाले आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणावर शोकाकूल वातावरणात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत सहा बळी घेतल्याने संतप्त गावकºयांनी वन विभागावर रोष व्यक्त करीत उपविभागीय महसूल अधिकाºयाचे शासकीय वाहन शनिवारी रात्री पेटवून दिले होते. दरम्यान, गावातील तणाव निवळला असला तरी परिसरातील दहा गावांमध्ये वाघाची दहशत कायमच आहे.गत वर्षभरापासून राळेगाव तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या जंगलात वाघाची दहशत आहे. आतापर्यंत या वाघाने सहा जणांचा बळी घेतला आहे. शनिवारी सखी येथील सतीश पांडुरंग कोवे (१९) या तरुणावर हल्ला करून त्याला ठार केले. त्याचा मृतदेह ३०० मीटरपर्यंत फरफटत नेला. वाघाचे सातत्याने हल्ले होत असताना वन विभाग मात्र कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने सखी येथील गावकरी संतप्त झाले. याच रोषाचा सामना उपविभागीय महसूल अधिकारी संदीपकुमार अपार यांना करावा लागला. ते आपल्या शासकीय वाहनाने सखी येथे शनिवारी रात्री गेले होते. त्यावेळी वन विभागाचे वाहन समजून गावकºयांनी त्यांच्याच वाहनाला पेटवून दिले. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठांनी सखीकडे धाव घेतली. गावकºयांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर रात्री जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमिष मानकर, राळेगाव पंचायत समितीचे माजी सभापती अशोक केवटे, कृष्णापूरचे सरपंच भीमराव बोटोणी, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय तेलंग, अरविंद फुटाणे, जया रागिनवार, दत्तात्रय देशमुख, भीमराव पुरके यांनी गावकºयांची समजूत काढली. त्यानंतर रात्रीच सतीश कोवे याचा मृतदेह एका ट्रॅक्टरमधून राळेगावला शवविच्छेदनासाठी रवाना केला.दरम्यान, वन विभागाने या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. प्रधान वन्यजीव विभागाकडून वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच अमरावती, बुलडाणा, मेळघाट आणि चंद्रपूरवरून पाच रेस्क्यू पथक पाचारण करण्यात आले आहे. तसेच वाघाला पकडण्यासाठी सात पिंजरे, दहा सीसीटीव्ही कॅमेरे, तीन मचान पुरविण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे. वन विकास महामंडळाचे मुख्य वनसंरक्षक त्रिपाठी, यवतमाळ मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण आणि वन विकास महामंडळाचे उपवनसंरक्षक व्ही.एन. पुनसे या परिसरात दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वन विभागाने सात ट्रॅप कॅमेरे लावले होते. परंतु त्यात वाघ दिसला नाही. २३ आॅगस्ट रोजी गजानन पवार या तरुणाचा वाघाने बळी घेतला. दुसºया दिवशी बंदर शिवारात गोºह्याची शिकार केली. यावेळी पगमार्कवरून नर आणि मादी असे दोन वाघ असल्याचे स्पष्ट झाले होते. हे जंगल घनदाट असून १५ किलोमीटर परिघात आहे.१०० तरुणांचे पथक तयार करण्यासाठी विशेष प्रतिसाद नाहीतणावात शवविच्छेदनवाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या सतीश कोवे याचा मृतदेह गावकºयांची समजूत काढून राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रविवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. वन विभागाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करीत होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सखी येथे दुपारी सतीशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार हेमंत गांगुर्डे व पोलीस उपस्थित होते. यावेळी सतीशच्या नातेवाईकांचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. प्रत्येकजण रोष व्यक्त करीत होता.यांचा गेला बळीराळेगाव तालुक्यात वर्षभरात वाघाने सहा जणांचा बळी घेतला. त्यात सोनाबाई वामन घोसले रा.सराटी, सखाराम लक्ष्मण टेकाम रा.झोटींगधरा, मारुती विठोबा नागोसे रा.खैरगाव, प्रवीण पुंडलिक सोनोने रा.तेजनी, गजानन शामराव पवार रा.सराटी आणि आता शनिवारी सतीश पांडुरंग कोवे रा.सखी यांचा समावेश आहे. सोबतच वाघाने अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी-शेतमजूर आणि गुराखी जंगलात जाण्यासाठी घाबरत आहेत.