शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

यवतमाळ जिल्ह्यांत वीज कोसळून 6 ठार, कळंब, राळेगाव आणि दारव्हा तालुक्यांतील घटनांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:51 IST

जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.

यवतमाळ : जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.चंदा शंकर रामगडे (६०), तेजस्वीनी शंकर रामगडे (२५), मधुकर पुरुषोत्तम ठोंबरे (३०) सर्व रा. आमला ता. कळंब, हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) रा. पाभळ ता. दारव्हा आणि मंजुळा चंद्रभान राऊत (६५) रा. निमगव्हाण ता. कळंब, अशी मृतांची नावे आहे. तर सुमित्रा माणिकराव अंबाडारे (४२), विजय माणिक अंबाडारे, दिनू चंद्रभान राऊत हे जखमी झालेत. कळंब तालुक्यातील आमला येथील चंदा आणि तेजस्वीनी या मायलेकी मक्त्याने केलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. त्यात दोघेही जागीच ठार झाल्या. तर याच गावातील मधुकर ठोंबरे हा एका शेतात काम करीत असताना वीज कोसळून ठार झाला.राळेगाव आणि कळंब तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निंबगव्हाण, वरणा शिवारात गुरुवारी दुपारी २ वाजता कापूस वेचण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज मजुरांच्या अंगावर पडली. त्यात मंजुळा राऊत जागीच ठार झाल्या. तर इतर तिघे जण जखमी झाले. अचानक वीज कोसळल्याने सर्वच जण बेशुद्ध पडले होते. काही वेळाने विजय अंबाडारे आणि दिनू राऊत यांना शुद्ध आली. पाहतात तर काय मंजुळाबाई ठार झालेल्या आणि सुमित्राबाई गंभीर जखमी होत्या. या जखमींना तत्काळ राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळला हलविण्यात आले. तिसरी घटना दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे घडली. हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) हा आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचणीवर लक्ष ठेवण्यासाठी गेला होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक अंगावर वीज कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत प्रथम लोणी आणि नंतर आर्णी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हेमंतला मृत घोषित केले.