शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

जिल्ह्यातील १२ शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी झालेल्या धान्याचे सुमारे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. यामुळे हमी केंद्र नावालाच उरले असून शेतकरी आर्थिक विवेचनेला सामोरे जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, मूग, उडीद : ३३ हजार क्ंिवटलची खरेदी, शासकीय हमी केंद्र नावाला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील १२ शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी झालेल्या धान्याचे सुमारे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. यामुळे हमी केंद्र नावालाच उरले असून शेतकरी आर्थिक विवेचनेला सामोरे जात आहे.जिल्ह्यातील हमी केंद्रांवर नोव्हेंबर अखेरपर्यंत ३३ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. या धानयाच्या खरेदीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ११ कोटी रुपये देणे होते. प्रत्यक्षात जिल्ह्याला सहा कोटी रूपयेच प्राप्त झाले. त्यामुळे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. दिवाळीपूर्वी शासनाने जिल्ह्यात सोयाबीन, मूग आणि उडदासाठी १२ शासकीय खरेदी केंद्र सुरू केले. गेल्या सव्वा महिन्यात या केंद्रांवरून ३३ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली.सोयाबीनच्या १२ हमी केंद्रांवर ३० हजार २७२ क्विंटलची खरेदी झाली. सोयाबीनच्या चुकाºयासाठी जिल्ह्याला नऊ कोटी २३ लाख ३८६ रूपयांची गरज होती. प्रत्यक्षात पाच कोटी ५५ लाख ३९ हजार रूपयांचा निधी हमी केंद्रांना मिळाला. जिल्ह्यात मूग आणि उडदाची ५ हमी केंद्रांवर खरेदी करण्यात आली. यात तीन हजार ६१८ क्विंटल उडीद आणि २९७ क्विंटल मुगाची खरेदी झाली. त्यात अडदाचे ७७ लाखांचे, तर मुगाचे ९ लाखांचे चुकारे मिळाले. सोयाबीन, मूग आणि उडीद मिळून अद्याप पाच कोटींचे चुकारे रखडले आहे. या चुकाºयाची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा आहे.यावर्षी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीची उतारीत घट आली. त्यातच सुरुवातीला कमी दरामुळे शेतकºयांंना आर्थिक नुकसान सोसावे लागले. यामुळे शेतकºयांची सर्व भिस्त सोयाबीन, मूग, उडीद आणि रबी हंगामातील गहू व हरभरा पिकावर अवलंबून आहे.१९०० क्ंिवटल कापूसजिल्ह्यातील सहा शासकीय हमी केंद्रांवर पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जात आहे. या केंद्रांवर आतापर्यंत जवळपास १९३० क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. खरेदी झालेल्या बहुतांश कापसाचे चुकारे अदा करण्यात आल्याचे पणन महासंघातर्फे सांगितले जाते. दरम्यान, ७६६ शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी आॅनलाईन बुकींग केली आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतहमी दरामुळे शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांवर आपले धान्य विकले. या केंद्रातून दोन पैसे जादा मिळतील, अशी अपेक्षा त्यांना होती. प्रत्यक्षात खरेदी झालेल्या धान्यातील अर्ध्या अधिक लाभार्थ्यांना चुकारेच मिळाले नाही. त्यामुळे हे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.