शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:58 IST

येथील नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कचºयाच्या निविदेवरून झालेल्या खडाजंगीनंतर भाजपाच्या उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी सभात्याग केला.

ठळक मुद्देवणी पालिकेची सर्वसाधारण सभा : कचऱ्याच्या निविदेवरून आपसातच खडाजंगी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कचºयाच्या निविदेवरून झालेल्या खडाजंगीनंतर भाजपाच्या उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी सभात्याग केला. येथील नगरपालिकेत भाजपाची सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तेतील पदाधिकाऱ्यांनी सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष असे दोन गट पडले असून विकासकामाच्या मुद्यावरून या दोन गटात तीव्र मतभेद झाले आहेत. गटबाजीमुळे पालिकेचे राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे.नगरपालिकेची सर्वसधारण सभा शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात सुरू झाली. या सभेत ११ विविध विषयांसह अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार होती. मागील सभेचे ईतिवृत्त वाचून ते कायम केल्यानंतर दुसरा विषय पटलावर येताच, सत्तेतील नगरसेवकांपैैकी राकेश बुग्गेवार यांनी शहरातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे सांगत एक कोटी १७ लाख ७९ हजार ८३३ रूपयांचे कचºयाचे वार्षिक कंत्राट देऊनही शहरात घाणीचे सम्राज्य का आहे, असा प्रश्न मुख्याधिकाºयांना विचारला. मागील वर्षी हेच कंत्राट सहा लाख ६६ रुपये प्रतिमाह दराने देण्यात आले होते. यावर्षी दर का वाढवून देण्यात आले, या आणि अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकाची बाजू न घेता, उलट नगरसेवकांनाच चूप बसण्यास सांगितले, असा आरोप नगरसेवक राकेश बुग्गेवार यांनी केला आहे. या मुद्यावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर पालिकेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गवार, संतोष डंभारे, धीरज पाते, विजय मेश्राम या पाचजणांनी संतप्त होऊन सभात्याग केला. मात्र त्यानंतरही सभा सुरळीत पडून अनेक ठराव पारित करण्यात आले.तहसील चौकाला अहल्याबाई होळकरांचे नावशुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वणी शहरातील तहसील चौकाला राजमाता अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. नगरसेवक नितीन चहानकर यांनी याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत तहसील चौकाला राजमाता अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. यासोबतच शहरातील लक्ष्मीनगर येथील चौकाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला. जो कुणी नगरपरिषदेचा कर भरेल, त्याला कचरा साठविण्यासाठी व कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी एक हिरवी व एक निळी बकेट पालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे.खरे तर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, आम्ही समस्या मांडल्यानंतर नगराध्यक्षांनी आमची बाजू घेत मुख्याधिकाऱ्यांना त्याबाबतचा जाब विचारणे अपेक्षित होते. मात्र घडले उलटेच नगराध्यक्षांकडून आमचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. हा अपमान सहन न झाल्याने मी व भाजपाच्या पाच नगरसेवकांनी सभात्याग केला.- श्रीकांत पोटदुखेउपाध्यक्ष, नगरपरिषद वणीअजेंड्यामध्ये असलेले विषय नियमानुसार अगोदर पटलावर घेणे गरजेचे असते. सभेत गोंधळ झाल्याने विकास थांबतो. तो होऊ नये म्हणून अगोदर अजेंड्यावर असलेले विषय घेतले. मात्र अजेंड्यावर नसलेल्या विषयावर चर्चा सुरू झाल्याने मी संबंधित नगरसेवकाला या विषयावर नंतर चर्चा करू असे सांगितले. मात्र त्याही उपरांतही त्यांनी सभात्याग केला.- तारेंद्र बोर्डेअध्यक्ष, नगरपरिषद वणी