शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

दोन पक्षात पहिल्यांदाच लढत

By admin | Updated: November 6, 2016 00:19 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या

विधान परिषद : काँग्रेस, शिवसेना-भाजपा युती उमेदवारासह अपक्ष रिंगणात यवतमाळ : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहे. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एक अपक्ष संदीप बाजोरिया यांच्यासह तीन उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास आतापर्यंत अपवाद वगळता पक्षाचे दोन उमेदवार कधीच आमने-सामने आले नाही. पक्षाच्या उमेदवाराला येथे अपक्षाचाच सामना करावा लागला. मात्र यावेळी शिवसेना-भाजपा युती सत्तेत असल्याने त्यांनी आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. काँग्रेसचे शंकर बडे आणि युतीचे तानाजी सावंत यांच्यात लढत होत आहे. पक्षाचे दोन उमेदवार आमने-सामने उभे ठाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा, १६ नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेतील ६२ सदस्य, १६ पंचायत समितीचे सभापती असे ४४० मतदार आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याकडे विधान परिषदेत जाण्यासाठी संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. विधान परिषदेत जाण्यासाठी किमान २२० सदस्यांकडून पसंतीक्रम मिळविणे आवश्यक आहे. हा जादुई आकडा गाठण्यासाठी पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे. ४४० मतदारांना दूरध्वनीवरून या उमेदवारांनी थेट संपर्क केला. ‘आशीर्वादा’साठी ‘प्रसाद’ही वाटला जाईल, असा शब्द या उमेदवारांनी मतदारांना दिला आहे. आता खऱ्या अर्थाने घोडा मैदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिलेला उमेदवार म्हणून काँग्रेस प्रचार करीत आहे. तर भाजपा-शिवसेनेतील स्टार नेते मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरली आहे. मतदारांची सर्वाधिक संख्या असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर भाजपा-शिवसेनेने अपक्ष आणि इतरही पक्षातील मतदारांची गोळा बेरीज सुरू केली आहे. २२० चा आकडा आवश्यक असला तरी नियोजन मात्र ४४० मतांचे केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) संख्याबळाचा अंदाज कठीण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत विधान परिषदेतील मतदारांना आयतीच संधी मिळाली आहे. नगरपरिषद निवडणूक रिंगणाबाहेर असलेल्या, पक्षाकडून तिकीट कापण्यात आलेल्या नगरसेवकांचे मतदानही विधान परिषदेसाठी निर्णायक ठरणारे आहे. पक्षांकडून त्यांच्या बाजूने असलेल्या आकडेवारीच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय घडामोडीत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने अद्याप तरी संख्याबळ कुणाकडे याचा अंदाज लावता येणे शक्य नाही. राजकीय पक्षांच्या दोनही उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या सदस्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ज्या आठ नगरपरिषदांमध्ये निवडणूक आहे, तेथील राजकीय गुंतागुंत सहजासहजी लक्षात येणारी नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्रात आघाडी घेणाऱ्यालाच विजयाचा टप्पा गाठता येणार आहे.