शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

दोन पक्षात पहिल्यांदाच लढत

By admin | Updated: November 6, 2016 00:19 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या

विधान परिषद : काँग्रेस, शिवसेना-भाजपा युती उमेदवारासह अपक्ष रिंगणात यवतमाळ : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहे. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एक अपक्ष संदीप बाजोरिया यांच्यासह तीन उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास आतापर्यंत अपवाद वगळता पक्षाचे दोन उमेदवार कधीच आमने-सामने आले नाही. पक्षाच्या उमेदवाराला येथे अपक्षाचाच सामना करावा लागला. मात्र यावेळी शिवसेना-भाजपा युती सत्तेत असल्याने त्यांनी आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. काँग्रेसचे शंकर बडे आणि युतीचे तानाजी सावंत यांच्यात लढत होत आहे. पक्षाचे दोन उमेदवार आमने-सामने उभे ठाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा, १६ नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेतील ६२ सदस्य, १६ पंचायत समितीचे सभापती असे ४४० मतदार आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याकडे विधान परिषदेत जाण्यासाठी संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. विधान परिषदेत जाण्यासाठी किमान २२० सदस्यांकडून पसंतीक्रम मिळविणे आवश्यक आहे. हा जादुई आकडा गाठण्यासाठी पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे. ४४० मतदारांना दूरध्वनीवरून या उमेदवारांनी थेट संपर्क केला. ‘आशीर्वादा’साठी ‘प्रसाद’ही वाटला जाईल, असा शब्द या उमेदवारांनी मतदारांना दिला आहे. आता खऱ्या अर्थाने घोडा मैदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिलेला उमेदवार म्हणून काँग्रेस प्रचार करीत आहे. तर भाजपा-शिवसेनेतील स्टार नेते मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरली आहे. मतदारांची सर्वाधिक संख्या असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर भाजपा-शिवसेनेने अपक्ष आणि इतरही पक्षातील मतदारांची गोळा बेरीज सुरू केली आहे. २२० चा आकडा आवश्यक असला तरी नियोजन मात्र ४४० मतांचे केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) संख्याबळाचा अंदाज कठीण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत विधान परिषदेतील मतदारांना आयतीच संधी मिळाली आहे. नगरपरिषद निवडणूक रिंगणाबाहेर असलेल्या, पक्षाकडून तिकीट कापण्यात आलेल्या नगरसेवकांचे मतदानही विधान परिषदेसाठी निर्णायक ठरणारे आहे. पक्षांकडून त्यांच्या बाजूने असलेल्या आकडेवारीच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय घडामोडीत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने अद्याप तरी संख्याबळ कुणाकडे याचा अंदाज लावता येणे शक्य नाही. राजकीय पक्षांच्या दोनही उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या सदस्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ज्या आठ नगरपरिषदांमध्ये निवडणूक आहे, तेथील राजकीय गुंतागुंत सहजासहजी लक्षात येणारी नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्रात आघाडी घेणाऱ्यालाच विजयाचा टप्पा गाठता येणार आहे.