शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दोन पक्षात पहिल्यांदाच लढत

By admin | Updated: November 6, 2016 00:19 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या

विधान परिषद : काँग्रेस, शिवसेना-भाजपा युती उमेदवारासह अपक्ष रिंगणात यवतमाळ : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहे. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एक अपक्ष संदीप बाजोरिया यांच्यासह तीन उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास आतापर्यंत अपवाद वगळता पक्षाचे दोन उमेदवार कधीच आमने-सामने आले नाही. पक्षाच्या उमेदवाराला येथे अपक्षाचाच सामना करावा लागला. मात्र यावेळी शिवसेना-भाजपा युती सत्तेत असल्याने त्यांनी आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. काँग्रेसचे शंकर बडे आणि युतीचे तानाजी सावंत यांच्यात लढत होत आहे. पक्षाचे दोन उमेदवार आमने-सामने उभे ठाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा, १६ नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेतील ६२ सदस्य, १६ पंचायत समितीचे सभापती असे ४४० मतदार आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याकडे विधान परिषदेत जाण्यासाठी संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. विधान परिषदेत जाण्यासाठी किमान २२० सदस्यांकडून पसंतीक्रम मिळविणे आवश्यक आहे. हा जादुई आकडा गाठण्यासाठी पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे. ४४० मतदारांना दूरध्वनीवरून या उमेदवारांनी थेट संपर्क केला. ‘आशीर्वादा’साठी ‘प्रसाद’ही वाटला जाईल, असा शब्द या उमेदवारांनी मतदारांना दिला आहे. आता खऱ्या अर्थाने घोडा मैदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिलेला उमेदवार म्हणून काँग्रेस प्रचार करीत आहे. तर भाजपा-शिवसेनेतील स्टार नेते मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरली आहे. मतदारांची सर्वाधिक संख्या असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर भाजपा-शिवसेनेने अपक्ष आणि इतरही पक्षातील मतदारांची गोळा बेरीज सुरू केली आहे. २२० चा आकडा आवश्यक असला तरी नियोजन मात्र ४४० मतांचे केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) संख्याबळाचा अंदाज कठीण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत विधान परिषदेतील मतदारांना आयतीच संधी मिळाली आहे. नगरपरिषद निवडणूक रिंगणाबाहेर असलेल्या, पक्षाकडून तिकीट कापण्यात आलेल्या नगरसेवकांचे मतदानही विधान परिषदेसाठी निर्णायक ठरणारे आहे. पक्षांकडून त्यांच्या बाजूने असलेल्या आकडेवारीच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय घडामोडीत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने अद्याप तरी संख्याबळ कुणाकडे याचा अंदाज लावता येणे शक्य नाही. राजकीय पक्षांच्या दोनही उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या सदस्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ज्या आठ नगरपरिषदांमध्ये निवडणूक आहे, तेथील राजकीय गुंतागुंत सहजासहजी लक्षात येणारी नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्रात आघाडी घेणाऱ्यालाच विजयाचा टप्पा गाठता येणार आहे.