शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पहिल्यांदाच पुसद मंत्रिमंडळाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

पुसदच्या बंगल्याने दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला मुख्यमंत्री दिले. त्यानंतर मंत्रिमंडळात बंगल्याची धुरा अविनाश नाईक, मनोहरराव नाईक यांनी सांभाळली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असताना पुसदच्या बंगल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही असे कधीच झाले नाही.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार : मंडळ-महामंडळावर पुनर्वसन होण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याला साडेतेरा वर्ष मुख्यमंत्री देणाऱ्या पुसदला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना यावेळी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाच्या बाहेर रहावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुसद बंगल्याच्या समर्थकांमध्ये काहीशी अस्वस्थता पहायला मिळत आहे.पुसदच्या बंगल्याने दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला मुख्यमंत्री दिले. त्यानंतर मंत्रिमंडळात बंगल्याची धुरा अविनाश नाईक, मनोहरराव नाईक यांनी सांभाळली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असताना पुसदच्या बंगल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही असे कधीच झाले नाही. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये मात्र बंगल्याला आमदारकीवर समाधान मानावे लागले. मात्र आघाडी सरकारमध्ये बंगल्याचे कॅबिनेट मंत्रीपद पक्केच होते. राज्यात आघाडी सरकार असताना मनोहरराव नाईकांकडे कॅबिनेट मंत्रीपद होते. यावेळी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक पुसद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. मात्र ज्युनिअर असल्याने त्यांचा मंत्रीपदासाठी विचार केला गेला नाही. मनोहरराव नाईक असते तर पुन्हा पुसदला कॅबिनेट मंत्रीपद नक्कीच मिळाले असते. परंतू यावेळी बंगल्याला केवळ आमदारकीवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार बनले असल्याने आधीच जागा वाटपात मंत्री पदाच्या जागा कमी मिळत आहे. मिळालेल्या जागांमध्ये जातीय व भौगोलिक समतोल राखताना, ज्येष्ठांचे पुनर्वसन करताना प्रमुख पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एवढे करूनही अनेक ज्येष्ठांना मंत्रिमंडळाबाहेर बसवावे लागत आहे. अशा वेळी पहिल्यांदाच निवडून आलेला ज्युनिअर आमदारांचा मंत्रिमंडळासाठी विचार होणे शक्यच नाही. म्हणून यावेळी पहिल्यांदाच पुसदच्या नाईक बंगल्याला आघाडीची सत्ता असूनही मंत्रिमंडळाबाहेर रहावे लागण्याची चिन्हे आहेत. याचे शल्य नाईक व बंगल्यांच्या समर्थकांमध्ये पहायला मिळते. मंत्रीमंडळात स्थान मिळणार नसले तरी आमदार इंद्रनील नाईक यांचे मंडळ-महामंडळावर पुनर्वसन केले जावे, अशी समर्थकांंची अपेक्षा आहे. राज्यात ८० लाखांवर बंजारा समाज आहे. या समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळावे अशी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र या मागणीचा विचार होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. पुनर्वसनाचा मात्र नक्कीच विचार केला जाऊ शकतो.दिग्रस मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदशिवसेनेचे संजय राठोड पक्षाच्या मंत्रिपदाच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये आहेत. त्यांना यावेळी बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार आहे. त्यांचा परिवहन, राज्य उत्पादन शुल्क या सारख्या महत्वाच्या खात्यांसाठी प्रयत्न राहू शकतो. राठोड यांच्या निमित्ताने शिवसेनेने बंजारा समाजाला योग्य सन्मान दिल्याचे मानले जाते. दिग्रस मतदारसंघाला या रूपाने पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी राज्यमंत्री पदावर मतदारसंघाला समाधान मानावे लागले होते.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड