शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पांढरकवडा नगर परिषदेत आर्थिक घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:53 IST

येथील नगर परिषदेमध्ये सन २०१४ ते २०१७ या कालावधीत झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा तपास करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे नगर परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश : रजनीकांत बोरेलेंनी दाखल केली होती याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील नगर परिषदेमध्ये सन २०१४ ते २०१७ या कालावधीत झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा तपास करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे नगर परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आरटीआय कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी २०१४ ते २०१७ या कालावधीत पांढरकवडा नगरपरिषदेच्या बांधकाम, आरोग्य इत्यादी विभागामध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये नगरपरिषदेच्या बांधकाम, आरोग्य तसेच विविध विभागात झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याचा तसेच निविदेतील घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा व संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. बोरेले यांच्या याचिकेवर १६ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी झाली असून यात वादी आणि प्रतिवादीचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाने निर्णय पारित केले आहे.जनहित याचिका क्रमांक १२२/२०१८ मधील उपस्थित केलेल्या मुद्यावर सहा महिन्याच्या आत तपास पूर्ण करावा आणि त्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर तपासादरम्यान अथवा अहवालादरम्यान जर कोणत्याही पक्षास तक्रार असल्यास ते या कोर्टासमक्ष येऊ शकतात.विभागीय आयुक्तांनी कंत्राटदारांना त्यांची रक्कम देण्याबाबत योग्य तो निर्णय द्यावा. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात आक्षेपांच्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता चार आठवड्यामध्ये निर्णय घ्यावा, असा आदेश देऊन याचिका निकाली काढण्यात येत आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.के.देशपांडे व न्यायाधिश विनय जोशी यांनी पारित केल्याची माहिती रजनीकांत बोरेले यांनी दिली आहे.कामाची पडताळणी करूनच देयके काढण्याची मागणी२०१८-२०१९ मध्ये नगरपरिषदेतील बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व इतर विभागातर्फे झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून या कामांची पडताळणी करून कामांची देयके काढण्यात यावी, अशी मागणी रजनीकांत बोरेले यांनी केली आहे. विभागीय आयुक्त अमरावती व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे याबाबत लवकरच आपण लेखी तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही बोरेले यांनी दिली. नगरपरिषदेतर्फे होणारी विविध कामे ही निकृष्ट दर्जाची होत असून सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे रजनीकांत बोरेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी