शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:36 IST

यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.......

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : पाईपलाईन दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले.शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून २० दिवसापासून नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे १३ प्रभागात २६ टँकरद्वारे पाण्याचे वितरण करण्यात येत होते. प्रत्येक कुटुंबाला २०० लीटरप्रमाणे पाणी वाटप करण्यात आले. शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत प्रशासनाने नवरगाव धरण व राजूर पीठचे पाणी नदीत सोडून वणीकरांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. राजूर पीठमधून येणाºया पाण्याची पाईपलाईन जागोजागी लिकेज असल्यामुळे तिच्या दुरूस्तीचे काम आता युद्धस्तरावर सुरू आहे.राजूर पीठ सेक्शन लाईन, रामदेवबाबा मंदिर व लालपुलिया परिसरात मोठे लिकेजेस असून ते बंद करण्यात आले आहे. या पाईपलाईनद्वारे येणारे पाणी लालपुलियामार्गे सोमवारी सायंकाळी ६ वाजता जॅकवेलपर्यंत पोहोचले. मात्र पाणी कमी प्रमाणात येत असल्यामुळे मंगळवारी रात्री जेसीबीच्या साह्याने निंबाळा गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ बुजून असलेली पाईपलाईन सरळ करण्यात आली. ही पाईपलाईन तुंबून असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जात होते. मात्र आता हा पाणी पुरवठा सुरळीत झाला असून पाण्याचा वेगही वाढला आहे. या आठ इंची पाईपलाईनमधून २० लाख लीटर पाणी नदीत सोडल्या जाणार आहे. याकरिता वेकोलिने नियोजन केले असून १५ हजार हॉर्स पॉवरचे दोन पंप सुरू केले आहे. तसेच नवरगाव धरणातून रविवारी दुपारी १२.३० वाजता ००.२० दलघमी पाणी सोडले असून धरणात केवळ ३.४९ दलघमी म्हणजे ३१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी वणीपर्यंत मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास निर्गुडा नदीत पोहोचले. त्यामुळे बुधवारी काही ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच राजूर पीठचेही पाणी आता नदीत सोडल्याने चार दिवसानंतर पाणी वितरीत होण्याची शक्यता आहे. राजूर पीठच्या पाण्यासाठी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला असून १४ नगरसेवकांनीही हा प्रश्न उचलून धरला होता. तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व सर्व नगरसेवकांनी पाण्यासाठी पुढाकार घेतला.