शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:36 IST

यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.......

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : पाईपलाईन दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले.शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून २० दिवसापासून नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे १३ प्रभागात २६ टँकरद्वारे पाण्याचे वितरण करण्यात येत होते. प्रत्येक कुटुंबाला २०० लीटरप्रमाणे पाणी वाटप करण्यात आले. शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत प्रशासनाने नवरगाव धरण व राजूर पीठचे पाणी नदीत सोडून वणीकरांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. राजूर पीठमधून येणाºया पाण्याची पाईपलाईन जागोजागी लिकेज असल्यामुळे तिच्या दुरूस्तीचे काम आता युद्धस्तरावर सुरू आहे.राजूर पीठ सेक्शन लाईन, रामदेवबाबा मंदिर व लालपुलिया परिसरात मोठे लिकेजेस असून ते बंद करण्यात आले आहे. या पाईपलाईनद्वारे येणारे पाणी लालपुलियामार्गे सोमवारी सायंकाळी ६ वाजता जॅकवेलपर्यंत पोहोचले. मात्र पाणी कमी प्रमाणात येत असल्यामुळे मंगळवारी रात्री जेसीबीच्या साह्याने निंबाळा गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ बुजून असलेली पाईपलाईन सरळ करण्यात आली. ही पाईपलाईन तुंबून असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जात होते. मात्र आता हा पाणी पुरवठा सुरळीत झाला असून पाण्याचा वेगही वाढला आहे. या आठ इंची पाईपलाईनमधून २० लाख लीटर पाणी नदीत सोडल्या जाणार आहे. याकरिता वेकोलिने नियोजन केले असून १५ हजार हॉर्स पॉवरचे दोन पंप सुरू केले आहे. तसेच नवरगाव धरणातून रविवारी दुपारी १२.३० वाजता ००.२० दलघमी पाणी सोडले असून धरणात केवळ ३.४९ दलघमी म्हणजे ३१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी वणीपर्यंत मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास निर्गुडा नदीत पोहोचले. त्यामुळे बुधवारी काही ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच राजूर पीठचेही पाणी आता नदीत सोडल्याने चार दिवसानंतर पाणी वितरीत होण्याची शक्यता आहे. राजूर पीठच्या पाण्यासाठी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला असून १४ नगरसेवकांनीही हा प्रश्न उचलून धरला होता. तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व सर्व नगरसेवकांनी पाण्यासाठी पुढाकार घेतला.