शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:36 IST

यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.......

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : पाईपलाईन दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले.शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून २० दिवसापासून नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे १३ प्रभागात २६ टँकरद्वारे पाण्याचे वितरण करण्यात येत होते. प्रत्येक कुटुंबाला २०० लीटरप्रमाणे पाणी वाटप करण्यात आले. शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत प्रशासनाने नवरगाव धरण व राजूर पीठचे पाणी नदीत सोडून वणीकरांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. राजूर पीठमधून येणाºया पाण्याची पाईपलाईन जागोजागी लिकेज असल्यामुळे तिच्या दुरूस्तीचे काम आता युद्धस्तरावर सुरू आहे.राजूर पीठ सेक्शन लाईन, रामदेवबाबा मंदिर व लालपुलिया परिसरात मोठे लिकेजेस असून ते बंद करण्यात आले आहे. या पाईपलाईनद्वारे येणारे पाणी लालपुलियामार्गे सोमवारी सायंकाळी ६ वाजता जॅकवेलपर्यंत पोहोचले. मात्र पाणी कमी प्रमाणात येत असल्यामुळे मंगळवारी रात्री जेसीबीच्या साह्याने निंबाळा गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ बुजून असलेली पाईपलाईन सरळ करण्यात आली. ही पाईपलाईन तुंबून असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जात होते. मात्र आता हा पाणी पुरवठा सुरळीत झाला असून पाण्याचा वेगही वाढला आहे. या आठ इंची पाईपलाईनमधून २० लाख लीटर पाणी नदीत सोडल्या जाणार आहे. याकरिता वेकोलिने नियोजन केले असून १५ हजार हॉर्स पॉवरचे दोन पंप सुरू केले आहे. तसेच नवरगाव धरणातून रविवारी दुपारी १२.३० वाजता ००.२० दलघमी पाणी सोडले असून धरणात केवळ ३.४९ दलघमी म्हणजे ३१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी वणीपर्यंत मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास निर्गुडा नदीत पोहोचले. त्यामुळे बुधवारी काही ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच राजूर पीठचेही पाणी आता नदीत सोडल्याने चार दिवसानंतर पाणी वितरीत होण्याची शक्यता आहे. राजूर पीठच्या पाण्यासाठी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला असून १४ नगरसेवकांनीही हा प्रश्न उचलून धरला होता. तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व सर्व नगरसेवकांनी पाण्यासाठी पुढाकार घेतला.