शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अखेर जिल्हा परिषदेच्या ८१ शाळा बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 22:01 IST

कमी पटसंख्येच्या शाळा शासनाला आर्थिक तरतुदीसाठी जड झाल्या आहेत. त्यामुळे त्या बंद करण्याच्या हालचाली गेल्या तीन वर्षांपासून सुरू होत्या. अखेर जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्याबाबत गुरुवारी संबंधित पंचायत समित्यांना आदेशही बजाविण्यात आले आहे.

ठळक मुद्देआदेश निघाले : शाळेचा यूडायस क्रमांक गोठविणार, संचमान्यताही नव्याने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कमी पटसंख्येच्या शाळा शासनाला आर्थिक तरतुदीसाठी जड झाल्या आहेत. त्यामुळे त्या बंद करण्याच्या हालचाली गेल्या तीन वर्षांपासून सुरू होत्या. अखेर जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्याबाबत गुरुवारी संबंधित पंचायत समित्यांना आदेशही बजाविण्यात आले आहे.मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेची पटसंख्या पुरेशी असणे आवश्यक आहे. या तरतुदीचा आधार घेत शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कमी पटाच्या ८१ शाळा बंद करण्याचा आदेश काढला आहे. यात ५० प्राथमिक, तर ३१ उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे.कोणत्या शाळा बंद होणार आणि तेथील विद्यार्थ्यांचे कोणत्या शाळेत समायोजन केले जाणार याबाबतची यादी शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी जाहीर केली आहे. बंद होणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आतील दुसºया शाळेत, तर उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरच्या आतील दुसºया शाळेत समायोजित केले जाणार आहे.विद्यार्थ्यांचे समायोजन करताना शिक्षकांच्या बदल्या हाणार आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेतून जिल्हा परिषद शाळेतच समायोजन झाल्यास विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही त्याच शाळेत जाणार आहे. मात्र एखाद्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन परिसरातील अन्य व्यवस्थापनाच्या किंवा अनुदानित शाळेत समायोजन झाल्यास शिक्षकांच्या समूपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहे.यात जिल्हा परिषदेच्या नऊ शाळांमधील विद्यार्थ्यांचे अनुदानित शाळेमध्ये समायोजन केले जाणार आहे. त्यामुळे येथील शिक्षकांची बदली केली जाणार आहे. त्याचवेळी ११ ठिकाणच्या मुला-मुलींच्या वेगवेगळ्या शाळांचे एकत्रिकरण केले जाणार आहे. दरम्यान समायोजन होणाºया शाळेतील शिक्षकांना त्याच तालुक्यात समायोजित करावे, जादा पटाच्या शाळा बंद करू नये, अशा सूचना शिक्षण समितीत केल्याची माहिती समिती सदस्य मधुकर काठोळे यांनी दिली.दरम्यान ८१ शाळांचे समायोजन इतरत्र होणार असल्याने त्यांचे युडायस क्रमांक गोठवून त्यांना विविध योजनांचा लाभही थांबविला जाणार आहे. या शाळेच्या इमारती ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित देण्यात येणार आहे. तर तेथील सर्व साहित्य, अभिलेखेही नव्या शाळेत हलविण्यात येणार आहे. तर जेथे हे समायोजन होईल, त्या शाळांची संचमान्यताही नव्याने करण्यात येणार आहे. या आदेशामुळे जिल्ह्याच्या शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद