शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बेंबळाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:25 IST

बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.

ठळक मुद्देटँँकरचे नव्याने नियोजन : दैनंदिन फेऱ्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. याशिवााय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाणीपुरवठा टॅँकरचे फेरनियोजन केले आहे. दिवसात अधिक फेऱ्या होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.बेंबळाचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पोहोचण्याचा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पिण्यायोग्य पाणी नसले तरी, दैनंदिन वापराकरिता पाणी आणण्याच्या कामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. टाकळी सम्प येथे मशीनरी आली असून जीवन प्राधिकरणच्या इलेक्ट्रीक विंगकडून काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी केबली पोहोचली आहे. शिवाय यवतमाळ शहरात येणाऱ्या पाईपलाईनचेही काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. ट्रायलमध्ये कोणता अडथळा न आल्यास दहा ते बारा दिवसात पाणी पोहोचविण्याची तयारी केली जात आहे. टाकळी सम्पच्या टाकीचे काम पूर्ण करण्याऐवजी तेथून थेट सम्पमधून पुरवठा सुरू करण्याच्या हालचाली केल्या जात आहे. टंचाईमुळे त्रस्त यवतमाळकरांचा दबाव यंत्रणेवर असल्याने कामाची गती वाढली आहे. त्यामुळे एकदा ट्रायल पूर्ण करून जीवन प्राधिकरण कार्यालयातील सम्पमध्ये पाणी पाहोचविले जाणार आहे. शहरातील अंतर्गत पाईपलाईनचेही काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.शहरातील टंचाई निवारणासाठी टॅँकरच एकमेव पर्याय आहे. गोखीच्या एमआयडीसी पॉर्इंटवर टॅँकरची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे प्रभागात टॅँकरच्या कमी फेऱ्या होत होत्या. हा गुंता सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शहरात पाच पॉर्इंट तयार केले आहे. तेथून मोठ्या टॅँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या ६१ टँकरने दिवसभरात ३२० फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. अंतर कमी झाल्याने फेऱ्या वाढल्या असून काटेकोरपणे प्रत्येक घरी किमान पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण