शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

बेंबळाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:25 IST

बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.

ठळक मुद्देटँँकरचे नव्याने नियोजन : दैनंदिन फेऱ्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. याशिवााय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाणीपुरवठा टॅँकरचे फेरनियोजन केले आहे. दिवसात अधिक फेऱ्या होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.बेंबळाचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पोहोचण्याचा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पिण्यायोग्य पाणी नसले तरी, दैनंदिन वापराकरिता पाणी आणण्याच्या कामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. टाकळी सम्प येथे मशीनरी आली असून जीवन प्राधिकरणच्या इलेक्ट्रीक विंगकडून काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी केबली पोहोचली आहे. शिवाय यवतमाळ शहरात येणाऱ्या पाईपलाईनचेही काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. ट्रायलमध्ये कोणता अडथळा न आल्यास दहा ते बारा दिवसात पाणी पोहोचविण्याची तयारी केली जात आहे. टाकळी सम्पच्या टाकीचे काम पूर्ण करण्याऐवजी तेथून थेट सम्पमधून पुरवठा सुरू करण्याच्या हालचाली केल्या जात आहे. टंचाईमुळे त्रस्त यवतमाळकरांचा दबाव यंत्रणेवर असल्याने कामाची गती वाढली आहे. त्यामुळे एकदा ट्रायल पूर्ण करून जीवन प्राधिकरण कार्यालयातील सम्पमध्ये पाणी पाहोचविले जाणार आहे. शहरातील अंतर्गत पाईपलाईनचेही काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.शहरातील टंचाई निवारणासाठी टॅँकरच एकमेव पर्याय आहे. गोखीच्या एमआयडीसी पॉर्इंटवर टॅँकरची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे प्रभागात टॅँकरच्या कमी फेऱ्या होत होत्या. हा गुंता सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शहरात पाच पॉर्इंट तयार केले आहे. तेथून मोठ्या टॅँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या ६१ टँकरने दिवसभरात ३२० फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. अंतर कमी झाल्याने फेऱ्या वाढल्या असून काटेकोरपणे प्रत्येक घरी किमान पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण