शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

चार कोटींच्या अवैध बियाणे प्रकरणात 15 गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

 खरिपाच्या तोंडावर बियाण्यांच्या विक्रीचे प्रमाण बाजारपेठेत वाढले आहेत. याच सुमारास अवैध बियाणे पॅकिंग करणारा कारखानाच उघड झाला. पुणे, अमरावती आणि यवतमाळच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या ठिकाणी चार कोटी १९ लाख रुपयांचा अवैध साठा उघड झाला. या प्रकरणात पंचायत समिती कृषी अधिकारी राजीव शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी दारव्हा पोलिसात संजय सोहनलाल मालानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. 

ठळक मुद्देट्रक जप्त : कृषी विभागाने गस्त वाढविली, प्रतिबंधित बिटीवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बोरी येथील धरतीधन बीज प्रक्रिया केंद्रावर शुक्रवारी तीन पथकांनी कारवाई केली. तब्बल सहा तास ही कारवाई चालली. रात्री ११.४५ वाजता या युनिटचे संचालक संजय सोहनलाल मालानी यांच्यावर दारव्हा पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले. एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्याची यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. फसवणुकीचे हे प्रकार टाळण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. सोयाबीनसोबत बिटी बियाण्यांवरही करडी नजर ठेवण्यात आली आहे.  खरिपाच्या तोंडावर बियाण्यांच्या विक्रीचे प्रमाण बाजारपेठेत वाढले आहेत. याच सुमारास अवैध बियाणे पॅकिंग करणारा कारखानाच उघड झाला. पुणे, अमरावती आणि यवतमाळच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या ठिकाणी चार कोटी १९ लाख रुपयांचा अवैध साठा उघड झाला. या प्रकरणात पंचायत समिती कृषी अधिकारी राजीव शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी दारव्हा पोलिसात संजय सोहनलाल मालानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.  कारखान्यात पथकाने ज्यावेळी कारवाई केली, त्यावेळी ३० किलोच्या बॅगमध्ये सोयाबीन बियाणे भरले जात होते. या बॅगवर  उत्पादक, प्रक्रिया व विपणन कर्ता, कंपनीचे नाव, पत्ता अशा कुठल्याच बाबी नव्हत्या. उगवण शक्ती, भौतिक शुद्धता, बियाणे तपासणी दिनांक, अशा बाबी नव्हत्या. उपलब्ध साठा, केलेली विक्री, त्याबाबतचे देयके, बीजोत्पादनाबाबत माहिती, बीजोत्पादक शेतकरी, यासह अनेक विषयांची माहिती कंपनीने पथकाला दिली. त्याचे कुठलेही दस्तावेज त्यांच्याकडे नव्हते. यामुळे कंपनीने आर्थिक फायद्यासाठी, शासनाची दिशाभूल करून शेतकऱ्यांचीही दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत आहे. यामुळे बियाणे कायदा १९६८, बीज अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, भारतीय दंड संहिता १८६० नुसार विविध १५ कलमान्वये संजय मालानी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 

बियाणे विक्री कुठे-कुठे झाली?- जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा प्रकारचे अवैध बियाणे कुठे-कुठे विकल्या गेले, याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मागविली आहे. खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापासून सावध केले जाणार आहे. अशा प्रकारचे अवैध बियाणे बनविणारा कारखाना आणखी कुठे आहे का, याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

जिल्हाभर अलर्ट- बोरी अरबमध्ये अवैध बियाणे पॅकिंग प्रकरणात चार कोटी १९ लाख रुपयांचे बियाणे जप्त केल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यांनी जिल्हयातील १७ पथकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कुठलाही गैरप्रकार निदर्शनास येताच, थेट कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. खासकरून सोयाबीन आणि बोगस बिटी बियाण्याची तपासणी केली जात आहे. याशिवाय विविध बियाण्यांचे नमुने घेतले जात आहे.टोल फ्री नंबरवर १२ तक्रारी- कृषी विभागाने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर आतापर्यंत १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगानेही कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. काही तक्रारी जुन्या आहेत, तर काही खताच्या अतिरिक्त किमतीबाबतही आल्या आहेत. 

 

टॅग्स :agricultureशेती