शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

चार कोटींच्या अवैध बियाणे प्रकरणात 15 गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

 खरिपाच्या तोंडावर बियाण्यांच्या विक्रीचे प्रमाण बाजारपेठेत वाढले आहेत. याच सुमारास अवैध बियाणे पॅकिंग करणारा कारखानाच उघड झाला. पुणे, अमरावती आणि यवतमाळच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या ठिकाणी चार कोटी १९ लाख रुपयांचा अवैध साठा उघड झाला. या प्रकरणात पंचायत समिती कृषी अधिकारी राजीव शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी दारव्हा पोलिसात संजय सोहनलाल मालानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. 

ठळक मुद्देट्रक जप्त : कृषी विभागाने गस्त वाढविली, प्रतिबंधित बिटीवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बोरी येथील धरतीधन बीज प्रक्रिया केंद्रावर शुक्रवारी तीन पथकांनी कारवाई केली. तब्बल सहा तास ही कारवाई चालली. रात्री ११.४५ वाजता या युनिटचे संचालक संजय सोहनलाल मालानी यांच्यावर दारव्हा पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले. एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्याची यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. फसवणुकीचे हे प्रकार टाळण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. सोयाबीनसोबत बिटी बियाण्यांवरही करडी नजर ठेवण्यात आली आहे.  खरिपाच्या तोंडावर बियाण्यांच्या विक्रीचे प्रमाण बाजारपेठेत वाढले आहेत. याच सुमारास अवैध बियाणे पॅकिंग करणारा कारखानाच उघड झाला. पुणे, अमरावती आणि यवतमाळच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या ठिकाणी चार कोटी १९ लाख रुपयांचा अवैध साठा उघड झाला. या प्रकरणात पंचायत समिती कृषी अधिकारी राजीव शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी दारव्हा पोलिसात संजय सोहनलाल मालानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.  कारखान्यात पथकाने ज्यावेळी कारवाई केली, त्यावेळी ३० किलोच्या बॅगमध्ये सोयाबीन बियाणे भरले जात होते. या बॅगवर  उत्पादक, प्रक्रिया व विपणन कर्ता, कंपनीचे नाव, पत्ता अशा कुठल्याच बाबी नव्हत्या. उगवण शक्ती, भौतिक शुद्धता, बियाणे तपासणी दिनांक, अशा बाबी नव्हत्या. उपलब्ध साठा, केलेली विक्री, त्याबाबतचे देयके, बीजोत्पादनाबाबत माहिती, बीजोत्पादक शेतकरी, यासह अनेक विषयांची माहिती कंपनीने पथकाला दिली. त्याचे कुठलेही दस्तावेज त्यांच्याकडे नव्हते. यामुळे कंपनीने आर्थिक फायद्यासाठी, शासनाची दिशाभूल करून शेतकऱ्यांचीही दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत आहे. यामुळे बियाणे कायदा १९६८, बीज अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, भारतीय दंड संहिता १८६० नुसार विविध १५ कलमान्वये संजय मालानी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 

बियाणे विक्री कुठे-कुठे झाली?- जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा प्रकारचे अवैध बियाणे कुठे-कुठे विकल्या गेले, याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मागविली आहे. खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापासून सावध केले जाणार आहे. अशा प्रकारचे अवैध बियाणे बनविणारा कारखाना आणखी कुठे आहे का, याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

जिल्हाभर अलर्ट- बोरी अरबमध्ये अवैध बियाणे पॅकिंग प्रकरणात चार कोटी १९ लाख रुपयांचे बियाणे जप्त केल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यांनी जिल्हयातील १७ पथकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कुठलाही गैरप्रकार निदर्शनास येताच, थेट कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. खासकरून सोयाबीन आणि बोगस बिटी बियाण्याची तपासणी केली जात आहे. याशिवाय विविध बियाण्यांचे नमुने घेतले जात आहे.टोल फ्री नंबरवर १२ तक्रारी- कृषी विभागाने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर आतापर्यंत १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगानेही कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. काही तक्रारी जुन्या आहेत, तर काही खताच्या अतिरिक्त किमतीबाबतही आल्या आहेत. 

 

टॅग्स :agricultureशेती