शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांशी जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:25 IST

सहकारी तत्वावरील साखर कारखाने बंद पडल्याने खाजगी व्यवस्थापनाचे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. तोंड पाहून उसाची तोड होत असल्याने अनेकांच्या शेतात ऊस उभा आहे.

ठळक मुद्दे शेतात ऊस उभाच : सहकारातील साखर कारखाने बंद पडल्याने शेतकरी रडकुंडीला

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : सहकारी तत्वावरील साखर कारखाने बंद पडल्याने खाजगी व्यवस्थापनाचे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. तोंड पाहून उसाची तोड होत असल्याने अनेकांच्या शेतात ऊस उभा आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी रडकुंडीला आले आहे.महागाव, उमरखेड तालुक्यातील दोन सहकारी साखर कारखाने बंद झाले. गुंज येथील साखर कारखाना खाजगी व्यवस्थापनाला विकण्यात आला तर वसंतची त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. दोन्ही तालुक्यात सुपिक जमीन आणि मुबलक पाणी आहे. त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. परंतु राजकारण्यांनी दोन्ही कारखान्याची वाट लावली. आता गुंज येथील साखर कारखाना नॅचरल शुगरने विकत घेतला आहे. त्यातच यंदा ऊस पळविण्याची स्पर्धा दिसत नाही.खाजगी कारखाना रिकव्हरी देणाऱ्या फडाला हात लावत आहे. पावणे दोन लाख मेट्रीक टन गाळप नॅचरल शुगरने केले आहे. कारखान्याची रिकव्हरी ११.८० आहे. रिकव्हरी लपविल्या जात असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. रिकव्हरी तपासण्यासाठी साखर आयुक्तांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांचा ऊस तोडण्याची आवश्यकता आहे. मात्र महागाव आणि पुसद तालुक्यात ऊसतोड टोळ्यात फिरताना दिसत नाही.पिळवणूक होऊनही सर्वच गप्पमहागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खासगी कारखाने पिळवणूक करीत आहे. मात्र या कारखान्याच्याविरुद्ध कुणीही बोलायला तयार नाही. शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना दिलासा दिला जात नाही. सर्व लोकप्रतिनिधी मात्र गप्प असल्याचे दिसून येते.