शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

सुपीक शेती दलालांच्या घशात

By admin | Updated: August 10, 2014 23:14 IST

वणी-मारेगाव-झरीजामणी या तीनही तालुक्यात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी दलालांच्या घशात जात आहे. या सुपिक शेतीवर प्लॉट पाडण्याचा सपाटा सुरू झाला आहे़ रस्त्यालगतच्या शेतजमिनीवर प्लॉट पाडून

गणेश रांगणकर - नांदेपेरावणी-मारेगाव-झरीजामणी या तीनही तालुक्यात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी दलालांच्या घशात जात आहे. या सुपिक शेतीवर प्लॉट पाडण्याचा सपाटा सुरू झाला आहे़ रस्त्यालगतच्या शेतजमिनीवर प्लॉट पाडून सुपीक शेतजमिनीला अकृषक (बिनशेती) बनविण्याचा सपाटा जोमाने सुरू आहे़ ग्रामीण भागातील ग्रामस्थ आता शहराकडे धाव घेऊ लागले आहे. त्यामुळे झपाट्याने शहरीकरणाला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक मोठे शेतकरी, नोकरदार आता शहरात वास्तव्याला जात आहे. परिणामी नागरिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी शहरालगतच्या सुपीक जमिनीवर ले-आउट पाडून तेथे प्लॉट निर्माण करून ते विकण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.वाढत्या नागरिकरणामुळे रस्त्यालगतच्या सुपीक शेतीला आणि गाव खारीला प्रचंड महत्त्व आले आहे. शेतकऱ्याची अगदी रस्त्यालगतची सुपीक शेती व गावालगतच्या ‘खारी’कडे आता दलालांचे लक्ष गेले आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या या हतबलतेचा लाभ घेत अनेक दलाल शेतकऱ्यांकडे घिरट्या घालत आहेत. सरकारी मूल्यांकनापेक्षा बाजारभावाने जादा रक्कमेचे आमिष दर्शवून दलाल दररोज शेतकऱ्यांच्या घरी पोहोचत आहेत. अनेक शेतकरी शेती विकण्यास उत्सुक नसतात. मात्र त्यांच्या घरी पोहोचून संबंधित दलाल तुमची शेती विकायची असेल तर आम्ही त्याला चांगला भाव देऊ, अशी प्रलोभने दाखवीत आहे़ त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी शेतीला चांगला भाव मिळत असल्याने दलालाच्या जाळ्यात सापडून अखेर शेती विकत आहे. शेती खरेदीचा सपाटा सुरू झाल्याने आता गावालगत, शहरालगत शेतीच शिल्लक राहिली नाही. जिकडे-तिकडे ले-आउट आणि प्लॉटच दिसून येत आहे़ मात्र या सुपीक शेतजमिनीला बिनशेती (अकृषक) म्हणून परवानगी कशी काय दिली जाते, असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्या शेतीत शेतकरी चांगले पीक घेऊन आपल्या कुटुंबाची उपजिवीका करीत होते, त्याच शेतीला बिनशेती (अकृषक) करून शेतात प्लॉट पाडले जात आहे़ प्लॉट पाडताना, शेतीला बिनशेती करताना, संंबंधित अधिकारी कोणती तपासणी करतात, स्थळ निरीक्षण अहवाल कसा तयार करतात, अनेक विभागांचे त्याला ‘ना हरकतख़ प्रमाणपत्र कसे मिळते, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. संबंधित विभाग कोणतीही चौकशी न करता प्लॉट पाडण्यासाठी ‘ना हरकत‘ प्रमाणपत्र कसे काय बहाल करतात, असाही प्रश्न आहे़ अनेक शेतात मौल्यवान झाडे असतात़ मात्र त्याच शेतात ले-आऊट पाडून त्यात प्लॉट पाडताना कोणतीही परवानगी न घेता झाडांची सर्रास कत्तल केली जाते़ झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक असते. मात्र परवानगी न घेताच झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे ले-आउटला संबंधित अधिकारी ‘डोळे बंद’ करून परवानगी कशी काय देतात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यात मात्र ले-आउटधारक व दलालांची चांदी होत आहे. त्यांनी गोरखधंदाच सुरू केला आहे़ सुपीक शेतजमीन दलाल व ले-आउटधारकांच्या घशात जाऊन ते अव्याचा-सव्वा पैसा कमावित आहेत.