शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

यवतमाळ जिल्ह्यातील महिला ठाणेदारांनी आणली गुन्हेगारी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:43 IST

संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ठाण्याच्या कारभार महिला ठाणेदाराने हाती घेतला. अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली.

ठळक मुद्देसामूहिक प्रयत्नदारव्हा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ठाण्याच्या कारभार महिला ठाणेदाराने हाती घेतला. अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली. दारू, मटका, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घातला. वरिष्ठांचे पाठबळ आणि सहकार्यांची साथ मिळत असल्याने दारव्हा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे.दारव्हा ठाणेदार म्हणून रिता उईके यांनी काही महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला. त्या दारव्ह्याच्या पहिल्या महिला ठाणेदार ठरल्या. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने त्यांनी आपल्या कार्याचा तालुक्यात ठसा उमटविला. त्यांनी प्रभार हाती घेताच पूर्वीची एकाधिकारशाही संपुष्टात आणली. बीटनिहाय अधिकारी व कर्मचारी नेमले. विकेंद्रीकरणामुळे इतरांनाही अधिकार मिळाले. त्यातून गुन्हेगारी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहे. दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८१ गावे येतात. कर्मचारी मात्र ६० आहे. आधीच संवेदनशील ठाणे असताना अपुरे कर्मचारी आहे. त्यातच पोलीस दलात सिंघम म्हणून ओळखले जाणारे अनिलसिंह गौतम यांच्यानंतर त्यांनी पदभार सांभाळला. त्यामुळे सामान्य जनतेच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर होते. परंतु त्यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळविले.सर्वप्रथम त्यांनी दारू विरोधी मोहीम उघडली. अल्पावधीत त्यांनी ११७ केसेस दाखल करून साडेतीन लाखांच्यावर मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्यावर धाडी मारुन ३१ जणांवर कारवाई केली. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. चार महिन्याच्या कालावधीत शहरात एखादा अपवाद वगळता कुठेही चोरी झाली नाही. शहरासोबतच ग्रामीण भागातही त्यांनी आपला वचक निर्माण केला. शिवजयंती, रामनवमी, मुंगसाजी महाराज पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी शांततेत पार पडल्या. ही ठाणेदार रिता उईके यांच्या यशस्वी कारकीर्दीची पावतीच होय. गुन्हेगारांना शिक्षा आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्या प्रयत्न करतात.दारव्हा शहराची संवेदनशील म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी ठाणेदार रिता उईके प्रयत्न करीत आहेत. त्यांना नागरिकांचेही सहकार्य लाभत आहेत.

नागरिकांच्या अपेक्षादारव्हा शहर तसेच ग्रामीण भागात गुन्हेगारी प्रवृत्तीवर त्यांनी वचक निर्माण केला. परंतु ग्रामीण भागातील दारू, मटका, जुगार आजही छुप्या पद्धतीने काही प्रमाणात सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी. दारव्हा तालुका दारूमुक्त व्हावा, अशी अपेक्षा आहे. तसेच शहरातील चिडीमारी बंद करून महिला व विद्यार्थिनींना सुरक्षितता वाटावी, असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुरळीत करण्याची अपेक्षा नागरिकांची आहे.

वरिष्ठांचे पाठबळ, सहकाऱ्यांची साथदारव्हा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. येथे डॉ. नीलेश पांडे सक्षम अधिकारी कार्यरत आहे. त्यांचे रिता उईके यांना वेळोवेळी पाठबळ मिळते. सहकारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पेठे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, वाहतूक शाखेचे प्रमुख तारासिंग जाधव, संतोष माने, संदीप मुपडे यांच्यासह रायटर कैलास लोथे व इतर कर्मचाऱ्यांची त्यांना मिळणारी साथ महत्वाची आहे.

टॅग्स :Policeपोलिस