शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील महिला ठाणेदारांनी आणली गुन्हेगारी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:43 IST

संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ठाण्याच्या कारभार महिला ठाणेदाराने हाती घेतला. अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली.

ठळक मुद्देसामूहिक प्रयत्नदारव्हा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ठाण्याच्या कारभार महिला ठाणेदाराने हाती घेतला. अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली. दारू, मटका, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घातला. वरिष्ठांचे पाठबळ आणि सहकार्यांची साथ मिळत असल्याने दारव्हा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे.दारव्हा ठाणेदार म्हणून रिता उईके यांनी काही महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला. त्या दारव्ह्याच्या पहिल्या महिला ठाणेदार ठरल्या. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने त्यांनी आपल्या कार्याचा तालुक्यात ठसा उमटविला. त्यांनी प्रभार हाती घेताच पूर्वीची एकाधिकारशाही संपुष्टात आणली. बीटनिहाय अधिकारी व कर्मचारी नेमले. विकेंद्रीकरणामुळे इतरांनाही अधिकार मिळाले. त्यातून गुन्हेगारी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहे. दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८१ गावे येतात. कर्मचारी मात्र ६० आहे. आधीच संवेदनशील ठाणे असताना अपुरे कर्मचारी आहे. त्यातच पोलीस दलात सिंघम म्हणून ओळखले जाणारे अनिलसिंह गौतम यांच्यानंतर त्यांनी पदभार सांभाळला. त्यामुळे सामान्य जनतेच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर होते. परंतु त्यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळविले.सर्वप्रथम त्यांनी दारू विरोधी मोहीम उघडली. अल्पावधीत त्यांनी ११७ केसेस दाखल करून साडेतीन लाखांच्यावर मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्यावर धाडी मारुन ३१ जणांवर कारवाई केली. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. चार महिन्याच्या कालावधीत शहरात एखादा अपवाद वगळता कुठेही चोरी झाली नाही. शहरासोबतच ग्रामीण भागातही त्यांनी आपला वचक निर्माण केला. शिवजयंती, रामनवमी, मुंगसाजी महाराज पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी शांततेत पार पडल्या. ही ठाणेदार रिता उईके यांच्या यशस्वी कारकीर्दीची पावतीच होय. गुन्हेगारांना शिक्षा आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्या प्रयत्न करतात.दारव्हा शहराची संवेदनशील म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी ठाणेदार रिता उईके प्रयत्न करीत आहेत. त्यांना नागरिकांचेही सहकार्य लाभत आहेत.

नागरिकांच्या अपेक्षादारव्हा शहर तसेच ग्रामीण भागात गुन्हेगारी प्रवृत्तीवर त्यांनी वचक निर्माण केला. परंतु ग्रामीण भागातील दारू, मटका, जुगार आजही छुप्या पद्धतीने काही प्रमाणात सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी. दारव्हा तालुका दारूमुक्त व्हावा, अशी अपेक्षा आहे. तसेच शहरातील चिडीमारी बंद करून महिला व विद्यार्थिनींना सुरक्षितता वाटावी, असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुरळीत करण्याची अपेक्षा नागरिकांची आहे.

वरिष्ठांचे पाठबळ, सहकाऱ्यांची साथदारव्हा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. येथे डॉ. नीलेश पांडे सक्षम अधिकारी कार्यरत आहे. त्यांचे रिता उईके यांना वेळोवेळी पाठबळ मिळते. सहकारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पेठे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, वाहतूक शाखेचे प्रमुख तारासिंग जाधव, संतोष माने, संदीप मुपडे यांच्यासह रायटर कैलास लोथे व इतर कर्मचाऱ्यांची त्यांना मिळणारी साथ महत्वाची आहे.

टॅग्स :Policeपोलिस