शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 21:41 IST

विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.

ठळक मुद्देसुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : वऱ्हाडी परंपरेमध्ये कार्यक्रमाला न बोलावलेल्या माणसाचेही मनापासून स्वागत केले जाते. संमेलनाच्या सुरुवातीला आमंत्रण नाकारल्याच्या घटनेमुळे खूप दु:ख झाले. गुंडप्रवृत्तीमुळे आयोजकांना हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.‘वर्धेला विनोबा भावेंनी जय जगतचा नारा दिला. मराठीचा अभिमान बाळगणारे आपण मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो आणि संमेलनात येण्यास इंग्रजी लेखिकेला नकार देतो, हा कोणता न्याय’, असा सवाल राणी बंग यांनी उपस्थित केला.बंग म्हणाल्या, ‘शिक्षणाने शहाणपण येते, असे मला वाटत नाही. शिकलेले लोक महामूर्ख असतात, तर अशिक्षित लोक जास्त शहाणे असतात. आधुनिकता म्हणजे धिंगाणा, व्यसनाधीनता, वाटेल तसे वागणे, असे शिकलेल्याना वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे नवीन पिढीने जाणून घेतले पाहिजे. साजरे करणे ही आपली प्रवृत्ती बनली आहे. आपल्या वागण्याला उत्सवी रूप आले आहे. लग्नसोहळा खर्चिक करण्याची सवय आपल्याला लागली आहे. गरीब लोकही श्रीमंतांचे अनुकरण करतात. त्यामुळे समाज संस्कृती बिघडत चालली आहे. सौंदर्याला अमाप महत्व दिले जाते. सौंदर्य प्रसाधनांचे दुष्परिणाम अनेक जणी भोगत आहेत. तरीही, अभिनेत्री सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करताना दिसतात. दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व द्यावे, हे तरुणाईला समजून सांगितले पाहिजे’. सना पंडित आणि डॉ. मोना चिमोटे यांनी बंग यांच्याशी संवाद साधला.आदिवासी लोक जास्त सुसंस्कृत की आपण? असा मला नेहमी प्रश्न पडतो. आदिवासी लोकांमध्ये चोरी होत नाही, त्यांच्यात एकही भिकारी नाही, तेथील मुली, स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. सुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे.प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाहीसाहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला जाणार होता. मात्र, या कार्यक्रमाला राणी बंग वगळता इतर तिन्ही मान्यवर अनुपस्थित होते. त्यामुळे ‘प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाही’ अशी भावना उपस्थितांमध्ये पहायला मिळाली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन