शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 21:41 IST

विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.

ठळक मुद्देसुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : वऱ्हाडी परंपरेमध्ये कार्यक्रमाला न बोलावलेल्या माणसाचेही मनापासून स्वागत केले जाते. संमेलनाच्या सुरुवातीला आमंत्रण नाकारल्याच्या घटनेमुळे खूप दु:ख झाले. गुंडप्रवृत्तीमुळे आयोजकांना हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.‘वर्धेला विनोबा भावेंनी जय जगतचा नारा दिला. मराठीचा अभिमान बाळगणारे आपण मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो आणि संमेलनात येण्यास इंग्रजी लेखिकेला नकार देतो, हा कोणता न्याय’, असा सवाल राणी बंग यांनी उपस्थित केला.बंग म्हणाल्या, ‘शिक्षणाने शहाणपण येते, असे मला वाटत नाही. शिकलेले लोक महामूर्ख असतात, तर अशिक्षित लोक जास्त शहाणे असतात. आधुनिकता म्हणजे धिंगाणा, व्यसनाधीनता, वाटेल तसे वागणे, असे शिकलेल्याना वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे नवीन पिढीने जाणून घेतले पाहिजे. साजरे करणे ही आपली प्रवृत्ती बनली आहे. आपल्या वागण्याला उत्सवी रूप आले आहे. लग्नसोहळा खर्चिक करण्याची सवय आपल्याला लागली आहे. गरीब लोकही श्रीमंतांचे अनुकरण करतात. त्यामुळे समाज संस्कृती बिघडत चालली आहे. सौंदर्याला अमाप महत्व दिले जाते. सौंदर्य प्रसाधनांचे दुष्परिणाम अनेक जणी भोगत आहेत. तरीही, अभिनेत्री सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करताना दिसतात. दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व द्यावे, हे तरुणाईला समजून सांगितले पाहिजे’. सना पंडित आणि डॉ. मोना चिमोटे यांनी बंग यांच्याशी संवाद साधला.आदिवासी लोक जास्त सुसंस्कृत की आपण? असा मला नेहमी प्रश्न पडतो. आदिवासी लोकांमध्ये चोरी होत नाही, त्यांच्यात एकही भिकारी नाही, तेथील मुली, स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. सुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे.प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाहीसाहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला जाणार होता. मात्र, या कार्यक्रमाला राणी बंग वगळता इतर तिन्ही मान्यवर अनुपस्थित होते. त्यामुळे ‘प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाही’ अशी भावना उपस्थितांमध्ये पहायला मिळाली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन