शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे व खतांचा शिरकाव होण्याची भीती

By admin | Updated: July 8, 2015 00:13 IST

बोगस बियाणे आणि खतांचा तालुक्यात शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. दलालांमार्फत हे साहित्य शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी धास्तावले : नेर येथे दलालांमार्फत विकले जात आहे साहित्यनेर : बोगस बियाणे आणि खतांचा तालुक्यात शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. दलालांमार्फत हे साहित्य शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. शिवाय कुठे असा प्रकार आढळल्यास तत्काळ तक्रार करण्याचेही सुचविण्यात आले आहे.तालुक्यात जवळपास ६० टक्के पेरणी आटोपली आहे. उर्वरित पेरणी आर्थिक टंचाई आणि पाऊस खोळंबल्याने थांबली आहे. याही स्थितीत बियाणे आणि खतांची खरेदी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. यासाठीच बोगस बियाणे आणि खते दाखल झाल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्याच्या मूर्तीजापूर येथील बोगस खताच्या कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात बोगस बियाणे आणि रासायनिक खतांची विक्री करताना काही लोकांना पकडण्यात आले. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभाग सतर्क झाला आहे. दररोज कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. संशयास्पद बाबींची चाचपणी केली जात आहे. यानंतरही काही व्यावसायिकांनी शेतकऱ्यांची वाढती मागणी असलेल्या बियाण्यांची जादा दराने विक्री करणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर यासाठी दलालांची नेमणूक केली जात आहे. बोगस बियाणे तालुक्यात आढळले नसले तरी त्याचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ही बियाणे विकण्याची शक्यता आहे. उधारित बियाणे देण्याची तयारीही काही लोकांकडून होण्याची शक्यता आहे. या प्रकाराला कुणीही बळी पडू नये, यासाठी कृषी विभागाने आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहे. तालुक्यात कपाशी आणि सोयाबीनची पेरणी अधिक क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बियाणे आणि खते खरेदी करताना अधिकृतता तपासून पाहावी, रितसर पावती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गावपातळीवर कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषी निविष्ठा करू नये आणि त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सुचविण्यात आले आहे. बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांबाबत अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसला होता. (तालुका प्रतिनिधी)