शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बोगस बियाणे व खतांचा शिरकाव होण्याची भीती

By admin | Updated: July 8, 2015 00:13 IST

बोगस बियाणे आणि खतांचा तालुक्यात शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. दलालांमार्फत हे साहित्य शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी धास्तावले : नेर येथे दलालांमार्फत विकले जात आहे साहित्यनेर : बोगस बियाणे आणि खतांचा तालुक्यात शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. दलालांमार्फत हे साहित्य शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. शिवाय कुठे असा प्रकार आढळल्यास तत्काळ तक्रार करण्याचेही सुचविण्यात आले आहे.तालुक्यात जवळपास ६० टक्के पेरणी आटोपली आहे. उर्वरित पेरणी आर्थिक टंचाई आणि पाऊस खोळंबल्याने थांबली आहे. याही स्थितीत बियाणे आणि खतांची खरेदी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. यासाठीच बोगस बियाणे आणि खते दाखल झाल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्याच्या मूर्तीजापूर येथील बोगस खताच्या कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात बोगस बियाणे आणि रासायनिक खतांची विक्री करताना काही लोकांना पकडण्यात आले. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभाग सतर्क झाला आहे. दररोज कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. संशयास्पद बाबींची चाचपणी केली जात आहे. यानंतरही काही व्यावसायिकांनी शेतकऱ्यांची वाढती मागणी असलेल्या बियाण्यांची जादा दराने विक्री करणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर यासाठी दलालांची नेमणूक केली जात आहे. बोगस बियाणे तालुक्यात आढळले नसले तरी त्याचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ही बियाणे विकण्याची शक्यता आहे. उधारित बियाणे देण्याची तयारीही काही लोकांकडून होण्याची शक्यता आहे. या प्रकाराला कुणीही बळी पडू नये, यासाठी कृषी विभागाने आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहे. तालुक्यात कपाशी आणि सोयाबीनची पेरणी अधिक क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बियाणे आणि खते खरेदी करताना अधिकृतता तपासून पाहावी, रितसर पावती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गावपातळीवर कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषी निविष्ठा करू नये आणि त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सुचविण्यात आले आहे. बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांबाबत अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसला होता. (तालुका प्रतिनिधी)