शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

कोसदनी घाटात अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:50 IST

नागपूर-तुळजापूर महामार्गावरील आर्णी ते धनोडा दरम्यान कोसदनी घाटात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलावरून वाहने स्लीप होऊन सातत्याने अपघात घडत असल्याने वाहनधारक दहशतीत सापडले आहे.

ठळक मुद्देचिखलाचे साम्राज्य : वाहनचालक दहशतीत, रस्ता बांधकाम कंपनीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील आर्णी ते धनोडा दरम्यान कोसदनी घाटात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलावरून वाहने स्लीप होऊन सातत्याने अपघात घडत असल्याने वाहनधारक दहशतीत सापडले आहे.सध्या नागपूर ते तुळजापूर या नवीन महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. आर्णी तालुक्यात रुंदीकरणाच्या कामाला गती आली आहे. उन्हाळ्यापूर्वीच सर्व काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र रस्ता बांधकाम कंपनीच्या दुर्लक्षामुळे अद्याप काम पूर्ण झाले आहे. रंदीकरणासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामातील माती आता रस्त्यावर पसरली आहे. पावसामुळे मातीचा चिखल निर्माण झाला आहे. त्यावरून वाहने घसरून अपघात होत आहे.आर्णी ते धनोडा दरम्यान मार्गक्रमण करताना वाहन चालकांची मोठी कसरत सुरु आहे. या दरम्यान कोसदनी घाट लागतो. नंतर एक नाला लागतो. हा घाट आणि नाला पार करताना चिखलामुळे दुचाकी वारंवार स्लीप होत आहे. दररोज या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत आहे. मोठी वाहनेसुद्धा चिखलामुळे स्लीप होत आहे. यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. याकडे रस्ता बांधकाम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभगाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मात्र रस्ता बांधकाम कंपनी व प्रशासानाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.पहिल्याच पावसामुळे बंधारा गेला वाहूनमहामागाचे रुंदीकरण अत्यंत संथगतीने होत आहे. पावसाळ्यापूर्वीच काम होणे अपेक्षित होते. ते अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता अपघाताची शक्यता निर्माण झाली. कोसदनी घाटातील रस्ता खोदून ठेवण्यात आला. पावसामुळे हा ४00 मीटरचा रस्ता अत्यंत दयनीय झाला. त्यावर जागोजागी खड्डे पडले. त्यात टोंगळाभर पाणी साचून संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरला. त्यामुळे घाटातून रस्ता पार करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. वाहने स्लीप होऊन अपघात होत आहे. घाटतील नाल्यावर पुलाचे काम सुरु करताना जुना पूल तोडला. तेथे बाजूलाच मातीचा बंधारा टाकला. त्यावरुन वाहतूक सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने आर्णी ते माहूर दरम्यान तब्बल दहा तास वाहतूक ठप्प पडली होती.

टॅग्स :Rainपाऊस