शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

४५ टक्के विद्युत मीटर फॉल्टी

By admin | Updated: August 9, 2014 23:58 IST

सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी

वसंतनगर : सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी वाटेल तशी नागरिकांची पिळवणूक करीत आहे. याचा प्रत्यय नुकताच वसंतनगर परिसराला आला. या ठिकाणी महावितरणने तब्बल ४५ टक्के मीटर फॉल्टी दाखविले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मीटर नादुरुस्तीचा परिसरातील हा विक्रमच म्हणावा लागेल.ग्राहकांना नाहक त्रास देण्याच्या प्रयत्नात महावितरणने वसंतनगर व वरंदळी मिळून असलेल्या ३०९ विद्युत मीटरपैकी तब्बल १४६ मीटर फॉल्टी दाखविले. वसंतनगर येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनसुद्धा विजेचा पुरवठा नियमित होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज खांबाजवळच्या किंवा झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारांना वारंवार झाडाच्या फांद्या लागत असल्याने वीज पुरवठा सतत खंडित होतो. लाईनमन मुख्यालयी राहात नसल्याने खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी खासगी लाईनमनचा आधार घ्यावा लागतो. आपला जीव धोक्यात टाकून अप्रशिक्षित लाईनमन खांबावर चढतात. अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीकडून वीज पुरवठा दुरुस्त करून घेणे अतिशय धोकादायक आहे. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू शकते. परंतु वीज कंपनीचा लाईनमनच उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे. मागील महिन्यात विठोली फिडरवर काम करताना सहाय्यक लाईनमनला विजेचा धोरदार झटका बसल्याने त्याला आपला एक हात गमवावा लागला होता. महावितरणने एकाच गावात ४५ टक्के मीटर एकाचवेळी फॉल्टी दाखविल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. सरासरी बिल पूर्वीच्या बिलाच्या तिप्पट येत असून ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. कंपनी सध्या सरसकट विद्युत ग्राहकांना किमान ५०० रुपयांच्या वरचे बिल देवून मोकळे होत आहे. या संदर्भात कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतल्या जात नसून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांमधून होत आहे. गारपीट, महापूर, अतिवृष्टी आदींच्या तडाख्यात सापडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग आधीच जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यातच आता महावितरणनेसुद्धा त्रास देणे सुरू केले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने जनता त्रस्त झाली असून याचा परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठ्यावरसुद्धा झाला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज बिल न भरता स्वत:जवळ ठेवतात. याचाही फटका ग्रामस्थांना बसत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून महावितरण कंपनीने ग्रामस्थांना नियमित वीज पुरवठा द्यावा व फॉल्टी मीटरची चौकशी करून बदलवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)