शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

४५ टक्के विद्युत मीटर फॉल्टी

By admin | Updated: August 9, 2014 23:58 IST

सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी

वसंतनगर : सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी वाटेल तशी नागरिकांची पिळवणूक करीत आहे. याचा प्रत्यय नुकताच वसंतनगर परिसराला आला. या ठिकाणी महावितरणने तब्बल ४५ टक्के मीटर फॉल्टी दाखविले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मीटर नादुरुस्तीचा परिसरातील हा विक्रमच म्हणावा लागेल.ग्राहकांना नाहक त्रास देण्याच्या प्रयत्नात महावितरणने वसंतनगर व वरंदळी मिळून असलेल्या ३०९ विद्युत मीटरपैकी तब्बल १४६ मीटर फॉल्टी दाखविले. वसंतनगर येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनसुद्धा विजेचा पुरवठा नियमित होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज खांबाजवळच्या किंवा झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारांना वारंवार झाडाच्या फांद्या लागत असल्याने वीज पुरवठा सतत खंडित होतो. लाईनमन मुख्यालयी राहात नसल्याने खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी खासगी लाईनमनचा आधार घ्यावा लागतो. आपला जीव धोक्यात टाकून अप्रशिक्षित लाईनमन खांबावर चढतात. अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीकडून वीज पुरवठा दुरुस्त करून घेणे अतिशय धोकादायक आहे. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू शकते. परंतु वीज कंपनीचा लाईनमनच उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे. मागील महिन्यात विठोली फिडरवर काम करताना सहाय्यक लाईनमनला विजेचा धोरदार झटका बसल्याने त्याला आपला एक हात गमवावा लागला होता. महावितरणने एकाच गावात ४५ टक्के मीटर एकाचवेळी फॉल्टी दाखविल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. सरासरी बिल पूर्वीच्या बिलाच्या तिप्पट येत असून ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. कंपनी सध्या सरसकट विद्युत ग्राहकांना किमान ५०० रुपयांच्या वरचे बिल देवून मोकळे होत आहे. या संदर्भात कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतल्या जात नसून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांमधून होत आहे. गारपीट, महापूर, अतिवृष्टी आदींच्या तडाख्यात सापडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग आधीच जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यातच आता महावितरणनेसुद्धा त्रास देणे सुरू केले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने जनता त्रस्त झाली असून याचा परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठ्यावरसुद्धा झाला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज बिल न भरता स्वत:जवळ ठेवतात. याचाही फटका ग्रामस्थांना बसत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून महावितरण कंपनीने ग्रामस्थांना नियमित वीज पुरवठा द्यावा व फॉल्टी मीटरची चौकशी करून बदलवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)