शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

४५ टक्के विद्युत मीटर फॉल्टी

By admin | Updated: August 9, 2014 23:58 IST

सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी

वसंतनगर : सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी वाटेल तशी नागरिकांची पिळवणूक करीत आहे. याचा प्रत्यय नुकताच वसंतनगर परिसराला आला. या ठिकाणी महावितरणने तब्बल ४५ टक्के मीटर फॉल्टी दाखविले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मीटर नादुरुस्तीचा परिसरातील हा विक्रमच म्हणावा लागेल.ग्राहकांना नाहक त्रास देण्याच्या प्रयत्नात महावितरणने वसंतनगर व वरंदळी मिळून असलेल्या ३०९ विद्युत मीटरपैकी तब्बल १४६ मीटर फॉल्टी दाखविले. वसंतनगर येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनसुद्धा विजेचा पुरवठा नियमित होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज खांबाजवळच्या किंवा झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारांना वारंवार झाडाच्या फांद्या लागत असल्याने वीज पुरवठा सतत खंडित होतो. लाईनमन मुख्यालयी राहात नसल्याने खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी खासगी लाईनमनचा आधार घ्यावा लागतो. आपला जीव धोक्यात टाकून अप्रशिक्षित लाईनमन खांबावर चढतात. अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीकडून वीज पुरवठा दुरुस्त करून घेणे अतिशय धोकादायक आहे. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू शकते. परंतु वीज कंपनीचा लाईनमनच उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे. मागील महिन्यात विठोली फिडरवर काम करताना सहाय्यक लाईनमनला विजेचा धोरदार झटका बसल्याने त्याला आपला एक हात गमवावा लागला होता. महावितरणने एकाच गावात ४५ टक्के मीटर एकाचवेळी फॉल्टी दाखविल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. सरासरी बिल पूर्वीच्या बिलाच्या तिप्पट येत असून ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. कंपनी सध्या सरसकट विद्युत ग्राहकांना किमान ५०० रुपयांच्या वरचे बिल देवून मोकळे होत आहे. या संदर्भात कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतल्या जात नसून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांमधून होत आहे. गारपीट, महापूर, अतिवृष्टी आदींच्या तडाख्यात सापडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग आधीच जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यातच आता महावितरणनेसुद्धा त्रास देणे सुरू केले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने जनता त्रस्त झाली असून याचा परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठ्यावरसुद्धा झाला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज बिल न भरता स्वत:जवळ ठेवतात. याचाही फटका ग्रामस्थांना बसत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून महावितरण कंपनीने ग्रामस्थांना नियमित वीज पुरवठा द्यावा व फॉल्टी मीटरची चौकशी करून बदलवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)