शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

कालबाह्य बसमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:09 IST

आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. प्रशासनाच्या या धोरणाचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा आगार : प्रवाशांना करावा लागतो असुविधेचा सामना, जुन्याच बसेसची केली जाते डागडुजी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. प्रशासनाच्या या धोरणाचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.पांढरकवडा आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी ६० बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या नऊ गाड्या आहेत. देखभाल व दुरुस्तीसाठी आगारात ३९ मेकॅनिक आहेत, तर वाहक व चालक मिळून एकूण २४७ कर्मचारी सेवा देत आहेत. या आगारातून पुणे, अकोला, नागपूर, अमरावती आदी ठिकाणी जलदगतीच्या बस मुक्कामी जातात. मात्र अनेकवेळा या बस रस्त्यातच नादुस्त होत असल्याचे चालक-वाहक सांगतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. तसेच चालक वाहकांचेही हाल होते. दिवसेंदिवस तिकीट दर वाढत आहे. किलोमीटरला जवळपास दीड रुपया भाडे आकारले जात आहे. असे असताना प्रवाशांना सुविधा देण्यास पांढरकवडा आगार कमी पडत आहे.बहुतांश बस मोडकळीस आलेल्या आहेत. यामध्ये मानव विकास मिशनच्या बसचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना धोकादायक प्रवास करावा लागतो. आगारातील बस अस्वच्छ, मोडकळीस आलेल्या, साईड ग्लास व खिडक्यांना दोरीने बांधून ठेवून कसातरी आधार दिला आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीची भिती असते. याबाबत पालक, नागरिकांनी आगार प्रमुखाकडे याकडे लक्ष देण्याची मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडता येत नाहीत. पण बसेसच नसल्यामुळे नियम मोडून चार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या आणि पाच ते सहा वर्षाच्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर जात आहेत. आगाराकडे सध्या ६० बसेस आहेत. त्यापैकी पांढरकवडा आगारातील ८६००, ८६०८, ८२६९, ७१२१, ७१६९, ९३७२ क्रमांकाच्या बसगाड्यासह ३० बसेस १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत. नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेसना दुरूस्ती करून वापरल्या जात आहे. या बसेस कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांना अंगावर झेलावे लागत असल्याचे चित्रही पहायला मिळते.पांढरकवडा येथे पाच वर्षात एकही नवीन बस नाहीप्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत बसेसची संख्या तेवढीच आहे. विशेष म्हणजे आगाराला गेल्या पाच वर्षात एकही बस मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सद्यस्थितीत पांढरकवडा आगारात या आगारातील ६० बसेस आहेत. त्यापैकी १० बसेस नादुरूस्त आहेत. उपलब्ध बसेससुद्धा मार्गावर बंद पडत असल्याच्या घटना आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.