शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

पाण्यासाठी पैनगंगा नदी पात्रातच उपोषण

By admin | Updated: January 8, 2015 23:03 IST

हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील

उमरखेड (कुपटी) : हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील ५० नागरिकांनी भोजनगर तांड्याजवळ पैनगंगेच्या नदीपात्रातच उपोषणाला प्रारंभ केला आहे. अल्प पावसाने यंदा उमरखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पैनगंगा नदी तर हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी अल्प विसर्ग करण्यात आला. परंतु पाणी चातारी, बोरीपर्यंतच पोहोचले. पुढील गावांमध्ये मात्र पाणीच पोहोचले नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह जनावरांसुद्धा भटकंती करावी लागत आहे. अनेक गावच्या नळयोजना ठप्प पडल्या आहे. इसापूर धरणातून सोडलेले पाणी वरच्या गावातील मंडळी अडवून ठेवतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे अनेक गावांना पाणीच मिळत नाही. इसापूर धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे, अशी मागणी करीत ६ जानेवारीपासून भोजनगर तांड्याजवह ५० नागरिक उपोषणाला बसले आहे. त्यात संजय देवकते, रतन राठोड, कैलास राठोड, युवराज राठोड, सुरेश पवार, संदीप राठोड आदींचा समावेश आहे. या उपोषणाबाबत जिल्हाधिकारी, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता आणि पोलीस खात्यालाही कळविण्यात आले आहे. परंतु दोन दिवसांपासून या उपोषणाची कुणीही दखल घेतली नाही. पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)