शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

पाण्यासाठी पैनगंगा नदी पात्रातच उपोषण

By admin | Updated: January 8, 2015 23:03 IST

हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील

उमरखेड (कुपटी) : हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील ५० नागरिकांनी भोजनगर तांड्याजवळ पैनगंगेच्या नदीपात्रातच उपोषणाला प्रारंभ केला आहे. अल्प पावसाने यंदा उमरखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पैनगंगा नदी तर हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी अल्प विसर्ग करण्यात आला. परंतु पाणी चातारी, बोरीपर्यंतच पोहोचले. पुढील गावांमध्ये मात्र पाणीच पोहोचले नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह जनावरांसुद्धा भटकंती करावी लागत आहे. अनेक गावच्या नळयोजना ठप्प पडल्या आहे. इसापूर धरणातून सोडलेले पाणी वरच्या गावातील मंडळी अडवून ठेवतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे अनेक गावांना पाणीच मिळत नाही. इसापूर धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे, अशी मागणी करीत ६ जानेवारीपासून भोजनगर तांड्याजवह ५० नागरिक उपोषणाला बसले आहे. त्यात संजय देवकते, रतन राठोड, कैलास राठोड, युवराज राठोड, सुरेश पवार, संदीप राठोड आदींचा समावेश आहे. या उपोषणाबाबत जिल्हाधिकारी, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता आणि पोलीस खात्यालाही कळविण्यात आले आहे. परंतु दोन दिवसांपासून या उपोषणाची कुणीही दखल घेतली नाही. पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)