शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

सोनखास परिसरात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:31 IST

नेर तालुक्यातील सोनखास परिसरात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून टँकरची मागणी होत आहे.

ठळक मुद्देटँकरची मागणी : महिलांची पाण्यासाठी पायपीट

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर तालुक्यातील सोनखास परिसरात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून टँकरची मागणी होत आहे.परिसरातील सोनखास(हेटी) येथे मार्चच्या अखेरीस तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली. महिलांना पाण्यासाठी रात्रीअपरात्री भटकावे लागत आहे. तरीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी टँकरची मागणी केली आहे. अतिरिक्त भारनियमनामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिसरात भारनियमनाच्या कहरामुळे पाणीटंचाईत भर पडली आहे.अनियमित भारनियमनामुळे परिसरातील पाणीपुरवठा योजनांवर विपरित परिणाम होत आहे. पाण्याची टाकी भरत नसल्याने पाणी मिळणे कठीण झाले आहे. अनेक गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हातपंप, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. हेटी येथील महिलांना एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. काही नागरिकांनी आता बैलबंडीद्वारे पाणी आणणे सुरू केले आहे. परिसरातील उत्तरवाढोणा, हेटी, घुई, सोनवाढोणा, मालखेड आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांच्यानंतर नळ येत असल्याने पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. भारनियमनामुळे अल्प वेळासाठीच पाणी येत आहे. ग्रामपंचायती मात्र नागरिकांकडे पाणीकर थकीत असल्याचे सांगून हात वर करीत आहे. सोनखास येथील ग्रामसेवक वैशाली थूल यांनी पाणीटंचाई निवारणार्थ नेर पंचायत समितीकडे टँकर आणि विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.

टॅग्स :Waterपाणी