शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

इच्छाशक्तीच्या जोरावर शेती हिरवीगार

By admin | Updated: August 4, 2015 02:35 IST

वरुण राजा रूसला. बळीराजा हताश झाला. शासनही चिंतेत पडले. मात्र मांजर्डाच्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने दुर्दम्य

मांजर्डा : ५५ वर्षीय शेतकऱ्याचे दुष्काळाशी दोन हात, चांगल्या उत्पादनाचा विश्वासयवतमाळ : वरुण राजा रूसला. बळीराजा हताश झाला. शासनही चिंतेत पडले. मात्र मांजर्डाच्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर शेती हिरवीगार केली आहे. त्यांनी १८ एकरात घेतलेले सोयाबीन सध्या फुल आणि कळीच्या अवस्थेत आहे. या शेतकऱ्याने यासाठी कुठली जादू केली नाही, तर केवळ प्रयत्नातून आलेल्या संकटावर मात केली आहे. त्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणास्रोत आहे. यवतमाळ तालुक्याच्या मांजर्डा येथील मोहन राठोड या शेतकऱ्याची ही यशकथा आहे. चांगला पाऊस होण्याच्या आशेने पेरणी केली. मात्र पावसाने बरीच विश्रांती घेतल्याने पिके वाळून जाण्याच्या स्थितीत आली. यावर चिंता करत न बसता त्यातून मोहन राठोड यांनी मार्ग शोधला. १८ एकरात पेरलेले सोयाबीन जगवायचेच या इच्छाशक्तीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले. तसा सुरुवातीपासूनच त्यांचा प्रयत्न राहिला. पाण्याचा योग्य वापर, योग्य खते आणि औषधांची निवड केली. लष्करी आणि उंट अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली. सुरुवातीलाच घेतलेली ही दक्षता आता पाऊस नसतानाही पिके टवटवीत राहण्यासाठी उपयोगी ठरली आहे.सध्याच्या हवामानातील बदल आणि हलकासा पाऊस यामुळे त्यांच्या सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाली आहे. एकरी १० क्विंटल सोयाबीन होण्यासोबतच दाणेही वजनदार आणि टपोरे राहील, असा विश्वास त्यांना आहे. निसर्गाचा लहरीपणा या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेल्या उपाययोजना आज फायद्याच्या ठरत आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची तयारी असेल तर कुठलेही संकट दूर सारता येते, हेच मोहन राठोड या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. (वार्ताहर)