शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शेतकऱ्यांना चिंता बियाणे आणि खतांची

By admin | Updated: May 24, 2015 00:03 IST

मृग नक्षत्र अवघ्या दोन आठवड्यावर आले असून, शेतकऱ्यांना बियाणे आणि खताची चिंता लागली आहे.

बँकांची नकारघंटा : महागाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट कायममहागाव : मृग नक्षत्र अवघ्या दोन आठवड्यावर आले असून, शेतकऱ्यांना बियाणे आणि खताची चिंता लागली आहे. दुष्काळात होरपळलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी आता मशागतीला प्रारंभ केला आहे. रोहिणी नक्षत्रातच पाऊस कोसळल्यास ऐनवेळेवर शेतकऱ्यांची मोठी त्रेधा उडणार आहे. त्यातच थकित कर्जदारांना बँकांन कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. महागाव तालुक्यात ८८ हजार ५५६ हेक्टर जमीन वहिती खाली आहे. कापूस, ज्वारी, तूर, सोयाबीन, उडीद, मुग आदी पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते. काळी कसदार जमीन आणि पैनगंगा व पुस नदीचा सुपीक प्रदेश असला तरी दुष्काळाने गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. कापूस, सोयाबीन हातचे गेले. रबी हंगामात गारपीटीने उद्ध्वस्त केले. अशा स्थितीत आता खरीप हंगाम आला आहे. शेतकरी मशागतीच्या तयारीत एक छदामही त्यांच्या हाती नाही. ट्रॅक्टरने मशागतीचे दर वधारले असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मालकांची मनधरणी करावी लागत आहे. मान्सून अंदमानमध्ये सक्रिय झाल्याचे वृत्त धडकताच शेतकऱ्यांची लगबग वाढली. त्यासोबतच चिंतेतही वाढ झाली आहे. आगामी खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चाचपणी सुरू केली. बियाणे आणि खते खरेदीसाठी अद्यापही शेतकऱ्यांजवळ पैसे दिसत नाही. थकित कर्जदारांना कर्ज द्यायचे नाही असे बँकांचे धोरण आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बँकांनी कर्ज दिले नाही तर सावकाराच्या दारातच शेतकऱ्यांना जाण्याची वेळ येणार आहे. गत वर्षीचे पैसे थकित असल्याने कृषी केंद्र चालकही उधारीवर बियाणे देण्यास तयार नाही. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम सुरूवातीलाच शेतकऱ्यांना कठीण जाणार आहे. त्यात दुबार आणि तिबार पेरणीची वेळ आली तर शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)गत कही वर्षांपासून शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नाही. यंदाही तशीच स्थिती आहे. नांगरणी, वखरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाईल. मात्र काही ठिकाणी मनुष्यबळाचीच आवश्यकता असते. त्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. कुणीही कामावर यायला तयार नाही.