शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चिंता बियाणे आणि खतांची

By admin | Updated: May 24, 2015 00:03 IST

मृग नक्षत्र अवघ्या दोन आठवड्यावर आले असून, शेतकऱ्यांना बियाणे आणि खताची चिंता लागली आहे.

बँकांची नकारघंटा : महागाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट कायममहागाव : मृग नक्षत्र अवघ्या दोन आठवड्यावर आले असून, शेतकऱ्यांना बियाणे आणि खताची चिंता लागली आहे. दुष्काळात होरपळलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी आता मशागतीला प्रारंभ केला आहे. रोहिणी नक्षत्रातच पाऊस कोसळल्यास ऐनवेळेवर शेतकऱ्यांची मोठी त्रेधा उडणार आहे. त्यातच थकित कर्जदारांना बँकांन कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. महागाव तालुक्यात ८८ हजार ५५६ हेक्टर जमीन वहिती खाली आहे. कापूस, ज्वारी, तूर, सोयाबीन, उडीद, मुग आदी पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते. काळी कसदार जमीन आणि पैनगंगा व पुस नदीचा सुपीक प्रदेश असला तरी दुष्काळाने गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. कापूस, सोयाबीन हातचे गेले. रबी हंगामात गारपीटीने उद्ध्वस्त केले. अशा स्थितीत आता खरीप हंगाम आला आहे. शेतकरी मशागतीच्या तयारीत एक छदामही त्यांच्या हाती नाही. ट्रॅक्टरने मशागतीचे दर वधारले असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मालकांची मनधरणी करावी लागत आहे. मान्सून अंदमानमध्ये सक्रिय झाल्याचे वृत्त धडकताच शेतकऱ्यांची लगबग वाढली. त्यासोबतच चिंतेतही वाढ झाली आहे. आगामी खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चाचपणी सुरू केली. बियाणे आणि खते खरेदीसाठी अद्यापही शेतकऱ्यांजवळ पैसे दिसत नाही. थकित कर्जदारांना कर्ज द्यायचे नाही असे बँकांचे धोरण आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बँकांनी कर्ज दिले नाही तर सावकाराच्या दारातच शेतकऱ्यांना जाण्याची वेळ येणार आहे. गत वर्षीचे पैसे थकित असल्याने कृषी केंद्र चालकही उधारीवर बियाणे देण्यास तयार नाही. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम सुरूवातीलाच शेतकऱ्यांना कठीण जाणार आहे. त्यात दुबार आणि तिबार पेरणीची वेळ आली तर शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)गत कही वर्षांपासून शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नाही. यंदाही तशीच स्थिती आहे. नांगरणी, वखरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाईल. मात्र काही ठिकाणी मनुष्यबळाचीच आवश्यकता असते. त्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. कुणीही कामावर यायला तयार नाही.