शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:28 IST

जिल्हा बँकेत आज बैठक : कर्ज मर्यादेत वाढची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. कर्ज रकमेसह व्याजाची वसुली केली जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. जिल्हा बँकेत संचालक मंडळाची बुधवार, २६ मार्च रोजी बैठक आहे. यात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. व्याजासह कर्ज वसुली करण्याचीही प्रथा शेतकऱ्यांचीच बैंक राबवत असल्याचा आरोप केला जात आहे. सततची नापिकी व शेतमालाला नसलेले भाव पाहता शेतकरी संकटात सापडला आहे. आजरोजी शेतकऱ्याजवळ काहीच शिल्लक नाही. अशावेळी बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला ३ लाख रुपयांच्या वर कर्ज मंजुरीचे अधिकार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना तीन लाखांवर कर्ज पाहिजे आहे, अशा शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे जिल्हा बँकेकडे मंजुरीसाठी पाठवली जातात. परंतु, त्यामध्ये बराच कालावधी लोटत असल्यामुळे उशिरा कर्ज मिळते. परिणामी शेतकऱ्यांचे नियोजन बिघडते.

"पाच लाख रुपये कर्ज मंजुरीचे अधिकार संबंधित शाखेला दिले तर शेतकऱ्याची गैरसोय थांबणार आहे. कर्जाची मर्यादा वाढवून देताना किमान २० टक्के तरी जास्त कर्ज मंजूर करावे. जेणेकरून शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशानंतर त्यांच्या हाती किमान २० ते २५ हजाराची रक्कम शिल्लक राहील. संचालक मंडळाने याबाबत विचार करावा."- संजय दौलत नाईक, अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी पेढी

"जिल्हा बँकेच्या शाखेला यापूर्वी तीन लाखांच्या वर कर्ज मंजुरीचे अधिकार होते. परंतु बऱ्याच प्रकरणात अनियमितता आढळून आली. त्यामुळे कर्ज मंजुरीचे अधिकार मुख्य शाखेकडे ठेवण्यात आले आहे. व्याजाच्या रकमेचे कोट्यवधी रुपये राज्य शासनाकडेच बाकी आहेत. कर्जाची रक्कमही नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारी आहे त्यामुळे कर्ज वसुली सुरू आहे."- प्रा. शिवाजी राठोड, संचालक, जिल्हा बँक, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळbankबँक