शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:28 IST

जिल्हा बँकेत आज बैठक : कर्ज मर्यादेत वाढची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. कर्ज रकमेसह व्याजाची वसुली केली जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. जिल्हा बँकेत संचालक मंडळाची बुधवार, २६ मार्च रोजी बैठक आहे. यात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. व्याजासह कर्ज वसुली करण्याचीही प्रथा शेतकऱ्यांचीच बैंक राबवत असल्याचा आरोप केला जात आहे. सततची नापिकी व शेतमालाला नसलेले भाव पाहता शेतकरी संकटात सापडला आहे. आजरोजी शेतकऱ्याजवळ काहीच शिल्लक नाही. अशावेळी बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला ३ लाख रुपयांच्या वर कर्ज मंजुरीचे अधिकार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना तीन लाखांवर कर्ज पाहिजे आहे, अशा शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे जिल्हा बँकेकडे मंजुरीसाठी पाठवली जातात. परंतु, त्यामध्ये बराच कालावधी लोटत असल्यामुळे उशिरा कर्ज मिळते. परिणामी शेतकऱ्यांचे नियोजन बिघडते.

"पाच लाख रुपये कर्ज मंजुरीचे अधिकार संबंधित शाखेला दिले तर शेतकऱ्याची गैरसोय थांबणार आहे. कर्जाची मर्यादा वाढवून देताना किमान २० टक्के तरी जास्त कर्ज मंजूर करावे. जेणेकरून शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशानंतर त्यांच्या हाती किमान २० ते २५ हजाराची रक्कम शिल्लक राहील. संचालक मंडळाने याबाबत विचार करावा."- संजय दौलत नाईक, अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी पेढी

"जिल्हा बँकेच्या शाखेला यापूर्वी तीन लाखांच्या वर कर्ज मंजुरीचे अधिकार होते. परंतु बऱ्याच प्रकरणात अनियमितता आढळून आली. त्यामुळे कर्ज मंजुरीचे अधिकार मुख्य शाखेकडे ठेवण्यात आले आहे. व्याजाच्या रकमेचे कोट्यवधी रुपये राज्य शासनाकडेच बाकी आहेत. कर्जाची रक्कमही नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारी आहे त्यामुळे कर्ज वसुली सुरू आहे."- प्रा. शिवाजी राठोड, संचालक, जिल्हा बँक, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळbankबँक