शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बैलजोडी काढली विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:42 IST

सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.

ठळक मुद्दे नापिकी, वैरणटंचाई : पाणी प्रश्नही झाला कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.उमरखेड तालुका विदर्भाच्या टोकावर आहे. तालुक्यापासून मराठवाडा सीमा नजीक आहे. भौगोलिकदृष्ट्या हा तालुका व्यापक आहे. तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. त्यामुळे हा तालुका सुपिक म्हणून गणला जातो. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडली आहे. त्यातच सततच्या नापिकीमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. पावसाअभावी नेमके कोणते पीक घ्यावे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. ही सर्व मदार बैलजोडीवर अवलंबून असते. बैलजोडीशिवाय शेत कसणे शक्यच नाही. मशागत त्यांच्याच भरवशावर केली जाते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई आणि वैरणटंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. बळीराजाला तसेही दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीला तोंड द्यावेच लागत आहे. त्यात यंद बैरणटंचाई निर्माण झाल्याने नाईलाजास्तव त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली बैलजोडी विक्रीस काढावी लागत आहे. बैलजोडीसोबतच पाळीव जनावरे विकण्याची वेळ पशुपालकांवर ओढवली आहे. सध्या तालुक्यातील बैलबाजारात मोठ्या प्रमाणात बैलजोडी विक्रीस येत आहे.खरिपानंतर रबीतही पावसाचा फटकागेल्या खरीप हंगामानंतर रबीचा हंगामही अत्यल्प पावसातच गेला. त्यामुळे मुक्या जनांवराच्या पाण्यासह वैरणाचा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. स्वत: हालअपेष्टा भोगात आत्तापर्यंत अनेकांनी बैलजोडी आणि इतर पाळीव जनावरे पोसली. मात्र यावर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी आणि वैरणटंचाईमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सतत संकटे येत असल्याने बळीराजा पुरता खचला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी