शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

शेतकऱ्यांनी बैलजोडी काढली विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:42 IST

सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.

ठळक मुद्दे नापिकी, वैरणटंचाई : पाणी प्रश्नही झाला कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.उमरखेड तालुका विदर्भाच्या टोकावर आहे. तालुक्यापासून मराठवाडा सीमा नजीक आहे. भौगोलिकदृष्ट्या हा तालुका व्यापक आहे. तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. त्यामुळे हा तालुका सुपिक म्हणून गणला जातो. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडली आहे. त्यातच सततच्या नापिकीमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. पावसाअभावी नेमके कोणते पीक घ्यावे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. ही सर्व मदार बैलजोडीवर अवलंबून असते. बैलजोडीशिवाय शेत कसणे शक्यच नाही. मशागत त्यांच्याच भरवशावर केली जाते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई आणि वैरणटंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. बळीराजाला तसेही दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीला तोंड द्यावेच लागत आहे. त्यात यंद बैरणटंचाई निर्माण झाल्याने नाईलाजास्तव त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली बैलजोडी विक्रीस काढावी लागत आहे. बैलजोडीसोबतच पाळीव जनावरे विकण्याची वेळ पशुपालकांवर ओढवली आहे. सध्या तालुक्यातील बैलबाजारात मोठ्या प्रमाणात बैलजोडी विक्रीस येत आहे.खरिपानंतर रबीतही पावसाचा फटकागेल्या खरीप हंगामानंतर रबीचा हंगामही अत्यल्प पावसातच गेला. त्यामुळे मुक्या जनांवराच्या पाण्यासह वैरणाचा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. स्वत: हालअपेष्टा भोगात आत्तापर्यंत अनेकांनी बैलजोडी आणि इतर पाळीव जनावरे पोसली. मात्र यावर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी आणि वैरणटंचाईमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सतत संकटे येत असल्याने बळीराजा पुरता खचला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी